-
राज्यासह देशभरात हिवाळा सुरु झाला असून आता वातावरणात गारवाही जाणवू लागला आहे.
-
मात्र, हिवाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे अतिशय आवश्यक असते. कारण या ऋतूमध्ये अनेक आजार होण्याची शक्यता अधिक असते.
-
हिवाळ्यात ताप आणि संसर्ग यांच्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे अतिशय आवश्यक असते.
-
मात्र हिवाळ्यात केलेल्या काही सामान्य चुकांमुळे आपण आपल्या आरोग्याचे मोठे नुकसान करू शकतो. या चुका कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
-
हिवाळ्यात कडक गरम पाण्याने अंघोळ करणे अनेकांना आवडते. मात्र, जास्तवेळ गरम पाण्यात राहिल्याने शरीर आणि मेंदूवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.
-
असे म्हटले जाते की अंघोळीसाठी कडक गरम पाण्याचा वापर केल्याने केराटिन नामक त्वचेच्या पेशींचे नुकसान होऊ शकते. यामुळे खाज येणे, कोरडेपणा, आणि पुरळ उठण्याची समस्या जाणवू शकते.
-
हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी बरेच लोक जास्त कपडे घालतात. परंतु जास्त कपडे परिधान केल्यामुळे, शरीर अतिउष्णतेचे बळी ठरू शकते. शरीराच्या अतिउष्णतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते.
-
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात सेरोटोनिनची पातळी कमी होते. परिणामी, आपल्या शरीराला अधिक कर्बोदक हवे असते.
-
म्हणूनच हिवाळ्यात भूक वाढू लागते. त्यामुळे हिवाळ्यात जास्त अन्न खाणे टाळा. जास्त भूक लागल्यास फक्त फायबर असलेल्या भाज्या किंवा फळे खा.
-
हिवाळ्यात अनेक लोक चहा किंवा कॉफीचे जास्त सेवन करू लागतात. परंतु चहा-कॉफीचे अतिसेवन शरीराला हानी पोहोचवते. कॅफिनचे जास्त प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
-
हिवाळ्यात गरमागरम सूप पिणे अनेकांना आवडते. मात्र सूप बनवताना योग्य पदार्थांची निवड करणे अतिशय आवश्यक आहे.
-
तज्ज्ञांनुसार, हिवाळ्यात सूपच्या रेसिपीमध्ये अधिक मोसमी उत्पादनांचा समावेश करणे नेहमीच चांगले असते जेणेकरून ते शरीराला योग्य पोषण प्रदान करेल.
-
हिवाळ्यात आपल्याला कमी तहान लागते आणि म्हणूनच बरेच लोक पाण्याचे सेवन कमी करतात.
-
मात्र, निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी पाण्याचे सेवन योग्य प्रमाणात केले पाहिजे. पाण्याचे सेवन कमी केल्याने अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
-
हिवाळ्यात थंडीमुळे अनेकजण घराबाहेर पडणे टाळतात. घरात राहिल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. घरी राहिल्याने तुमची शारीरिक हालचाल कमी होऊ शकते.
-
निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच या ऋतूमध्ये आळस न करता व्यायाम आणि योगासने करा.
-
या ऋतूमध्ये आपल्याला वेगवेगळे चटपटीत पदार्थ आणि फास्ट फूड खाण्याची इच्छा होते. अशावेळी आपण प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणावर करतो. मात्र, यामुळे लठ्ठपणा, मधुमेह यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात.
-
सर्व प्रातिनिधिक फोटो : Pexels
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख