-
बॉयफ्रेंड वा गर्लफ्रेंड असो किंवा नवरा-बायकोचं नातं असो; जर नात्यात एकमेकांविषयी प्रेम, काळजी, जिव्हाळा, समजूतदारपणा दिसत नसेल, तर नातं लवकर तुटू शकतं. (Photo : Freepik)
-
कोणतंही नातं सुरुवातीला खूप गोड वाटतं; पण जसजसा काळ आणि वेळ जातो, तसा जोडीदाराचा खरा स्वभाव समजतो आणि नात्यात अनेक गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात. ही लक्षणं वेळीच ओळखणं गरजेचं आहे; नाही तर नातं फार काळ टिकू शकत नाही. (Photo : Freepik)
-
जर तुमचा जोडीदार वारंवार तुमचा विश्वासघात करीत असेल, तर वेळीच सावध व्हा! कारण- असं नातं फाळ काळ टिकू शकत नाही. (Photo : Freepik)
-
कोणत्याही नात्यामध्ये संवाद हा खूप महत्त्वाचा घटक आहे. जर दोन व्यक्तींमध्ये संवाद नसेल, तर नात्यामध्ये अनेक गैरसमज निर्माण होऊ शकतात; ज्यामुळे नातं तुटण्याची शक्यता आणखी वाढते. (Photo : Freepik)
-
नवरा-बायको किंवा गर्लफ्रेंड वा बॉयफ्रेंडच्या नात्यामध्ये छोटी-मोठी भांडणं होत असतात. पण, जर नात्यामध्ये संवाद कमी आणि भांडणं जास्त होत असतील, तर ही चिंतेची बाब आहे. (Photo : Freepik)
-
ज्या नात्यामध्ये एकमेकांविषयी भावना उरत नाहीत, ते नातं फार काळ टिकू शकत नाही. एकमेकांच्या भावना समजून घेणं, एकमेकांविषयी काळजी, प्रेम, जिव्हाळा नसेल, तर नातं तुटण्याच्या मार्गावर असू शकतं. (Photo : Freepik)
-
जर तुमचा जोडीदार तुमच्यावर शारीरिक हिंसाचार किंवा मानसिक अत्याचार करीत असेल, तर अशा जोडीदाराबरोबर राहणं चुकीचं आहे. या नात्यातून लवकरात लवकर बाहेर पडा. (Photo : Freepik)
-
कोणतंही नातं फक्त प्रेमावर टिकत नाही. नात्यात एकमेकांविषयी आदर-सन्मान असणं तितकंच गरजेचं आहे. जर जोडीदार तुमचा वारंवार अपमान करीत असेल, तुम्हाला तुच्छतेची वागणूक मिळत असेल, तर अशा नात्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. (Photo : Freepik)
-
जर नात्यामध्ये गैरसमज होत असतील आणि नातं तुटण्याच्या मार्गावर असेल तरीसुद्धा तुम्ही किंवा तुमचा जोडीदार नातं सुधारण्याचा प्रयत्न करीत नसाल, तर समजावं की हे नातं फार काळ टिकू शकत नाही. (Photo : Freepik)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”