-
वेलचीचे भारतीय जेवणात अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेलची पदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी वापरली जाते. वेलची घालून केलेला चहा चवीला अप्रतिम वाटतो. (Photo : Freepik)
-
वेलचीचे अनेक गुणकारी फायदे आहेत. वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात जे स्नायूंना मजबूत करण्यास मदत करतात. (Photo : Freepik)
-
वेलचीचे असे असंख्य फायदे आहेत पण तुम्हाला वेलचीची शेती कशी करतात हे माहिती आहे का? (Photo : Freepik)
-
वेलचीची शेती ही फक्त केरळमध्ये केली जाते आणि ती सुद्धा फक्त पहाडी भागात होते. कारण वेलचीच्या शेतीला भरपूर पाऊस आणि दमट वातावरणाची गरज असते त्यामुळे अशाच ठिकाणी वेलचीची शेती केली जाते. (Photo : Freepik)
-
नल्लानी वेलची, २५०० रुपये प्रति किलो असा दर या वेलचीचा आहे. (Photo : Freepik)
-
वेलचीच्या एका झाडापासून येथील शेतकरी आठ ते दहा हजार रुपये कमवत असतो. एका झाडापासून वर्षातून ४-५ किलो वेलचीचे उत्पादन निघते. (Photo : Freepik)
-
वेलचीची शेती फक्त केरळमध्ये केली जाते. पण हल्ली महाराष्ट्र, कोकण , कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये सुद्धा वेलचीची शेती केली जाते. (Photo : Freepik)
-
फक्त वेलचीची लागवड करण्यासाठी किमान १० अंश सेल्सिअस आणि कमाल ३५ अंश सेल्सिअप तापमान असावे लागते. (Photo : Freepik)
-
जर घरीच अशा पद्धतीने वेलचीची शेती केली तर फक्त एका झाडापासून तुम्ही दहा हजार रुपये कमावू शकता.हा एक उत्तम व्यवसाय आहे.(Photo : Freepik)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”