-
आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्रासह जीवनाच्या विविध पैलूंवर बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत.
-
यश मिळविण्यासाठी चाणक्यांचे धोरण रामबाण उपाय मानले जाते. तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल, तर चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या ‘या’ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
-
आचार्य चाणक्य आपल्या नीतीमध्ये कर्माबद्दल स्पष्टीकरण देताना म्हणतात की, कर्माचे फळ व्यक्तीच्या कृतीत राहते. मानवी बुद्धीदेखील कर्मानुसार कार्य करते. तरीही शहाणी माणसे नीट विचार करूनच कोणतेही काम सुरू करतात.
-
विचार न करता, कोणतेही काम केल्यास यश मिळणार नाही. कोणतेही काम करण्यापूर्वी चांगले धोरण बनवा आणि मग त्या कामात गुंतून राहा, यश नक्कीच मिळेल, असे ते सांगतात.
-
चाणक्य म्हणतात की, मनुष्याला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून मूल्यमापन करूनच कामाचा विचार व्हायला हवा, असे ते म्हणतात.
-
एकूणच विचार न करता, कोणतेही काम अचानक सुरू करणे योग्य नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. आपण जे काही काम करणार आहोत, त्याचा आधी गांभीर्याने विचार करा.
-
जीवनात निर्णय घेणे महत्त्वाचे आहे; पण त्यासाठी विचारपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. घाईघाईने निर्णय घेणारी माणसे प्रत्येक पावलावर निराश होतात.
-
एकदा मनाने एखादी गोष्ट स्वीकारली की, माणूस कितीही वेळा निराश झाला तरी त्याची हिंमत खचत नाही. मनाने हरणारे पराभूत होतात आणि मनाने जिंकणारे विजयी होतात, असेही ते म्हणतात.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे) (फोटो सौजन्य : freepik \ loksatta )
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”