-
एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करणारा समोरच्याची परिस्थिती, रंग, रूप, वय या गोष्टींना फारसं महत्त्व देत नाही. प्रेमामध्ये दोघांची मनं जुळायला हवी हेच खूप महत्त्वाचं असतं असं म्हटलं जातं. पूर्वी मुलींची लग्न त्यांच्यापेक्षा जवळपास १०-१२ वर्षाने मोठ्या असलेल्या मुलांबरोबर लावून दिली जायची. (फोटो सौजन्य: लोकसत्ता)
-
पण, आताच्या काळातील पती-पत्नी एकाच वयाचे असतात किंवा पत्नी पतीपेक्षा वयाने मोठी असते. पण, भारतीय समाजामध्ये पारंपरिकपणे असे मानले जाते की, पती पत्नीपेक्षा मोठा असावा. पण, ही गोष्ट खरोखर आवश्यक आहे का? (फोटो सौजन्य: Freepik)
-
भारतीय समाजात पती-पत्नीमधील वयातील तीन ते पाच वर्षांचा फरक लग्नासाठी आदर्श मानला जातो, ज्यामध्ये पती हा मोठा जोडीदार असतो. ही कल्पना खोलवर रुजलेली आहे, विशेषतः व्यवस्थित विवाहांमध्ये जिथे वयाचा घटक अनेकदा खूप महत्त्वाचा असतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता)
-
आजकाल प्रेमविवाह अधिक सामान्य होत आहेत आणि शहरी भागात वयातील फरक हा सहसा कमी चिंतेचा विषय असतो. परंतु, समाजात अजूनही असा एक वर्ग आहे, जो या पारंपरिक कल्पनांवर विश्वास ठेवतो.(फोटो सौजन्य: Freepik)
-
काही लोकांसाठी पती-पत्नीमधील वयाचा फरक ही फक्त एक प्रथा आहे. या विषयावर विज्ञानाचेही स्वतःचे मत आहे. विज्ञानानुसार, लग्नाचा विचार करताना शारीरिक आणि मानसिक परिपक्वता खूप महत्त्वाची आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता)
-
साधारणपणे मुली मुलांपेक्षा लवकर प्रौढ होतात. मुलींमध्ये हार्मोनल बदल ७ ते १३ वयोगटात सुरू होतात, तर मुलांमध्ये ते ९ ते १५ वर्षांच्या दरम्यान सुरू होतात, ज्यामुळे पुरुषांपेक्षा महिलांमध्ये भावनिक स्थिरता आणि मानसिक समज लवकर विकसित होते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
भारतात लग्नाचे कायदेशीर वय मुलींसाठी १८ वर्षे आणि मुलांसाठी २१ वर्षे आहे. या संदर्भात पती-पत्नीमध्ये तीन वर्षांचा फरक सामान्यतः योग्य मानला जातो. हे वैज्ञानिकदृष्ट्या शारीरिक परिपक्वतेशी जोडलेले आहे, परंतु हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की लग्न केवळ शारीरिक विकासावर अवलंबून नाही. (फोटो सौजन्य: लोकसत्ता)
-
लग्नाचे यश वयाच्या फरकाने ठरवले जात नाही तर पती-पत्नीमधील प्रेम, आदर आणि समजूतदारपणाने ठरवले जाते. वयाचा फरक तीन वर्षांचा असो किंवा १५ वर्षांचा, खरोखर यशस्वी नातेसंबंध परस्पर समजूतदारपणा, भावनिक आधार आणि सहवासावर बांधले जातात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
चाणक्य नीतीनुसार, पती-पत्नीमधील वयाचे अंतर किमान ३ ते ५ वर्षे असले पाहिजे आणि ते चांगले मानले जाते. आचार्य चाणक्य म्हणतात की, वयातील फरक कमी झाल्यामुळे पती-पत्नी एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात, त्यांच्या समान विचारसरणीमुळे त्यांचे वैवाहिक जीवनही आनंदात जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता)
Aaditya Thackeray : दिशा सालियनला ओळखत होतात का? घटनास्थळी उपस्थित होतात का? आदित्य ठाकरे पहिल्यांदाच स्पष्ट बोलले, म्हणाले…