-
देशात अनलॉक अंतर्गत बऱ्याच गोष्टी सुरु झाल्या आहेत. पण अजूनही करोनाचा धोका टळलेला नाही. हिवाळयात करोनाचे रुग्ण वाढण्याचा धोका कायम आहे. (Photo: AP)
-
त्यामुळेच या व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सर्वांचेच लक्ष लशीकडे लागले आहे. भारतात एकूण तीन लशी चाचणीच्या वेगवेगळया स्टेजवर आहेत. (Photo: Reuters)
-
या लशीच्या तिसऱ्या फेजच्या चाचण्या सुरु झाल्या आहेत. आतापर्यंतच्या मानवी चाचणीमध्ये ही लस सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका वरिष्ठ सरकारी वैज्ञानिकाने रॉयटर्सला सांगितले. भारत सरकारचे पाठबळ लाभलेली स्वदेशी 'कोव्हॅक्सीन' लस २०२१ च्या दुसऱ्या तिमाहीत उपलब्ध होईल अशी चर्चा होती. पण ही लस त्याआधीच फेब्रुवारी महिन्यात उपलब्ध होऊ शकते.
-
-
पुढच्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजे मार्च नंतर ही लस बाजारात येईल अशी चर्चा होती. 'लस बऱ्यापैकी प्रभावी ठरली आहे' असे आयसीएमआरच्या वैज्ञानिक रजनी कांत यांनी सांगितले. त्या कोविड-१९ टास्क फोर्सच्या सदस्य आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.
-
'पुढच्यावर्षी फेब्रुवारी-मार्चपर्यंत ही लस उपलब्ध होऊ शकते' असे त्या म्हणाल्या. काही किरकोळ बदल सुचवून ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने भारत बायोटेकला तिसऱ्या फेजची चाचणीसाठी परवागनी दिली.
-
आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी (एनआयव्ही) बीबीआयएलने मिळून कोव्हॅक्सीन लस विकसित केली आहे.
-
या लस निर्मिती प्रकल्पात सहभागी असलेल्या एनआयव्हीने करोनाची लागण झालेल्या पण कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णाच्या शरीरातून करोना व्हायरसचा स्ट्रेन वेगळा काढला.
-
संग्रहीत
-
तिसऱ्या फेजमध्ये हजारो लोकांवर कोव्हॅक्सीन लशीच्या चाचण्या करण्यात येतील. भारत बायोटेकने विकसित केलेली कोव्हॅक्सीनची लस ६० टक्के परिणाकारक ठरु शकते.

७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?