-
करीरोड येथील वन अविघ्न पार्क इमारतीच्या १९ व्या मजल्यावर शुक्रवारी लागलेल्या आगीत स्वत:चा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या सुरक्षा रक्षकाचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला.
-
गेल्या १० वर्षांमध्ये मुंबईत निरनिराळ्या ठिकाणी ४८,४३४ आगीच्या दुर्घटना घडल्या असून यापैकी १५६८ आगीच्या दुर्घटना गगनचुंबी इमारतींमध्ये घडल्या आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस बहुमजली इमारती असुरक्षित बनू लागल्या आहेत.
-
‘परिमंडळ-एक’च्या हद्दीत ९,८८७ आगीच्या दुर्घटना घडल्या असून यापैकी ३२५ दुर्घटना गगनचुंबी इमारत, एक हजार ५४६ दुर्घटना रहिवासी इमारतीत, ९८७ दुर्घटना व्यावसायिक इमारतीत आणि ७५ दुर्घटना झोपडपट्टीत घडल्या आहेत.
-
‘परिमंडळ-दोन’च्या हद्दीत सर्वाधिक १०,७१९ आगीच्या दुर्घटना घडल्या असून त्यापैकी १२९ गगनचुंबी इमारती, १,८२४ निवासी इमारती, ६६४ व्यावसायिक इमारती आणि ९३४ झोपडय़ांचा समावेश आहे.
-
‘परिमंडळ-तीन’च्या हद्दीत ८,७१७ आगीच्या घटना घडल्या असून त्यात ४९६ गगनचुंबी इमारती, १,३८२ रहिवासी इमारती, ९३९ व्यावसायिक इमारती आणि ४४३ झोपडय़ांचा समावेश आहे.
-
तसेच ‘परिमंडळ-चार’च्या हद्दीत एकूण ८,३२८, ‘परिमंडळ-पाच’च्या हद्दीत ५,६८३, तर ‘परिमंडळ-सहा’च्या हद्दीत एकूण ५,१०७ आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत.
-
‘परिमंडळ-तीन’मध्ये सर्वाधिक म्हणजे ४९६ गगनचुंबी इमारतींमध्ये आग लागली होती. तर ‘परिमंडळ-चार’च्या हद्दीतील १८३५ निवासी इमारतींना आगीची झळ बसली होती.
-
‘परिमंडळ-एक’मधील सर्वाधिक म्हणजे ९८७ व्यावसायिक इमारती, तर ‘परिमंडळ-पाच’मध्ये सर्वाधिक १२७३ झोपडय़ांना आग लागली होती.
-
दशकभरामध्ये म्हणजेच सन २००८ ते २०१८ दरम्यान मुंबईत आगीच्या एकूण ४८ हजार ४३४ घटना घडल्यात.
-
यापैकी गगनचुंबी इमारतींमध्ये १ हजार ५६८ वेळा आग लागलीय. तर निवासी इमारतींमध्ये आग लागण्याच्या घटना ८ हजार ७३७ वेळा घडल्यात.
-
याच कालावधीत मुंबई व्यावसायिक इमारतींना लागलेल्या आगीच्या घटनांची संख्या ३ हजार ८३३ इतकी आहे तर झोपडपट्ट्यांमध्ये आगी लागल्याच्या घटना ३ हजार १५१ वेळा घडल्यात.
-
सर्वाधिक वेळा म्हणजेच ३२ हजार ५१६ वेळा मुंबईत शॉर्टसर्किटमुळे आगी लागल्याच्या घटना घडल्यात.
-
त्या खालोखाल १ हजार ११६ वेळा गॅस सिलिंडरमधून गळती झाल्याने आगी लागल्यात. अन्य कारणांमुळे ११ हजार वेळा ८८९ आगी लागल्या आहेत.
-
२००८ ते २०१८ दरम्यान मुंबई लागलेल्या आगीच्या घटनांमध्ये ६०९ जण मृत्यूमुखी पडलेत. या आगींमध्ये ८९ कोटी ४ लाख ८६ हजार १०२ रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झालं आहे.
-
माहितीचा अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत केलेल्या अर्जावर पालिकेकडून उपलब्ध झालेली माहिती. (सर्व फोटो फाइल फोटो आहेत, एएनआयवरुन साभार)
महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन