-
बरोबर १३ वर्षांपूर्वी १० दहशतवाद्यांनी भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर हल्ला केला. सलग ३ दिवस सुरू असलेल्या हल्ल्यांनी मुंबई अक्षरशः थांबली.
-
२००८ च्या या दहशतवादी हल्ल्यात परदेशी नागरिकांसह एकूण १६६ नागरिकांनी जीव गमावला. (Express photo by Prashant Nadkar)
-
ताजमहाल पॅलेस हॉटेल आगीत जळत असतानाचं दृष्य तर मुंबईकरांच्या मनात अगदी कोरलं गेलं आणि त्याने या हल्ल्याची भीषणता कायम करून दिलीय. (Express photo by Vasant Prabhu)
-
पोलीस दल आणि सुरक्षा दलाने तात्काळ कारवाई केल्यानंतरही तब्बल ६० तास ४ शस्त्रास्त्रांचा मोठा साठा असलेल्या दहशतवाद्यांनी अक्षरशः मुंबईला वेठीस धरलं.
-
कुलाबातील कॅफे लिओपोल्डवरही दहशतवाद्यांनी हल्ला केला. या ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ११ जणांचा मृत्यू तर २८ जण जखमी झाले होते. (Express Photo by Vasant Prabhu)
-
दहशतवाद्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबाराचे निशाण या ठिकाणी काचांवर पाहायला मिळाले. (Express Photo by Pradip Das)
-
मुंबईतील सीएसटी येथे दहशतवादी हल्ल्यानंतर काचांचा खच पडलेला पाहायला मिळाला. हल्ल्यानंतर या ठिकाणची साफसफाई करतानाचा हा फोटो. (Express photo: Pradeep Kocharekar)
-
मुंबईतील कामा हॉस्पिटलजवळच दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. या ठिकाणी त्यांना आदरांजली वाहताना नागरिक. (Express photo : Prashant Nadkar)
-
हा फोटो मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर बरोबर १ महिन्याने नरिमन हाऊस येथे काढण्यात आला. यात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराच्या खुणा स्पष्टपणे पाहता येतात.
-
नोव्हेंबर २००८ मध्ये जेव्हा ताजमहाल हॉटेलचे सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली तेव्हा सुरक्षित ठिकाणी जाताना जवान. (AP)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”