-
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे प्राथमिक कल हाती आले असून उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा योगी सरकार सत्तता काबिज करेल असं चित्र दिसत आहे.
-
तर दुसरीकडे पंजाबमध्ये आपचा मुख्यमंत्री बसेल असं चित्र प्राथमिक कल दर्शवत आहेत. गोव्यामध्ये त्रिशंकू तर उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये कमळ फुलण्याची चिन्हं दिसत आहेत.
-
हे प्राथमिक कल सध्या तरी काँग्रेससाठी फारच धक्कादायक ठरत असून पंजाबसारख्या महत्वाच्या राज्यामधील सत्ताही काँग्रेसच्या हातून जाणार असं चित्र दिसतंय.
-
एकीकडे हा काँग्रेसाठी मोठा धक्का मानला जात असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होत काही विक्रमांना गवसणी घालणार आहेत. यावरच टाकलेली नजर…
-
स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशात सलग दोन वेळा मुख्यमंत्री बनवण्याचा विक्रम योगी आदित्यनाथ करण्याच्या मार्गावर आहेत.
-
याआधी काँग्रेसचे गोविंद वल्लभ पंत सलग दोनवेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते.
-
परंतु पंत पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा तो युनायटेड प्रोव्हिन्स होता आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. त्यामुळे स्वतंत्र भारतात हा पराक्रम करणारे योगी पहिलेच नेते ठरणार आहेत.
-
उत्तर प्रदेशच्या राजकारणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या पक्षाला दुसऱ्यांदा सत्ता मिळाली त्या पक्षाने आपल्या आधीच्या मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा नेतृत्व दिलं नाहीय.
-
१९५० पासून १९६७ दरम्यान उत्तर प्रदेशची सत्ता काँग्रेसकडे होती. मात्र गोविंद वल्लभ पंतंपासून सुरु झालेली मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा तीन मुख्यमंत्री बदलल्यानंतर चंद्रभान गुप्तांपर्यंत पोहोचली.
-
काँग्रेसने या कालावधीमध्ये कधीच एकाच व्यक्तीला मुख्यमंत्री पदाची दुसरी टर्म दिली नाही.
-
म्हणजेच १९५० ते १९६७ दरम्यान काँग्रेसचं सरकार आलं तेव्हा दरवेळेस मुख्यमंत्री बदलण्यात आले.
-
त्यानंतर १९८० ते १९८९ दरम्यान पुन्हा काँग्रेस पक्ष या सर्वात महत्वाच्या राज्यात सत्तेत होता. या नऊ वर्षांमध्ये एक दोन नाही तर तब्बल पाच मुख्यमंत्री राज्याने पाहिले.
-
भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये १९९७ ते २००२ दरम्यान पहिल्यांदा पाच वर्षे सत्तेत राहण्याचा पराक्रम केला.
-
मात्र या पाच वर्षांमध्ये भाजपाला तीन मुख्यमंत्री बदलावे लागले.
-
भाजपाने २१ सप्टेंबर १९९७ साली पहिल्यांदा राज्यात सरकार बनवलं तेव्हा कल्याण सिंह मुख्यमंत्री झाले.
त्यांतर दोन वर्षांनी भाजपाचे राम प्रकाश गुप्ता मुख्यमंत्री झाले. -
मात्र राम प्रकाश गुप्ता यांना एक वर्षाचा कार्यकाळही पूर्ण करता आला नाही. त्यांना ३५१ व्या दिवशी पदावरुन हटवण्यात आलं अन् त्यांच्या जागी आले राजनाथ सिंह.
-
राम प्रकाश गुप्ता यांच्यानंतर भाजपाने राजनाथ सिंह यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली.
याचप्रमाणे ३ जून १९९५ साली मायावती पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री झाल्या तेव्हाचं सरकार १८ ऑक्टोबर १९९५ पर्यंत म्हणजेच १३७ दिवस चाललं. मात्र त्यानंतर हे सरकार पडलं आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. -
तब्बल दोन वर्षानंतर राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली आणि मायावती दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या.
-
त्यानंतर त्या या पदावर अवघ्या १८४ दिवसच या पदावर राहिल्या. कारण त्या मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा एका वर्षासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. त्यांना आपला कार्यकाळही पूर्ण करता आला नाही.
-
नोएडासंदर्भात उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये एक समज आहे. मुख्यमंत्री असताना नोएडाचा दौरा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचं सरकार पुढच्या निवडणुकीला पडतं असं म्हटलं जातं.
-
अनेक दशकांपासून उत्तर प्रदेशच्या राजकारणात ही गोष्ट दबक्या आवाजात कायमच चर्चेत राहिलीय. मात्र आता योगींनी हे सुद्धा खोटं ठरवलंय.
-
१९८८ मध्ये काँग्रेसचे वीर बहादूर सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि ते नोएडा दौऱ्यावर गेले. त्यानंतर पुढील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
-
नंतर १९८९ साली एन. डी. तिवारी नोएडामधील सेक्टर १२ मध्ये नेहरु पार्कच्या उद्घाटनाला गेले आणि काही दिवसांत त्यांचं मुख्यमंत्री पद गेलं.
-
नंतर कल्याण सिंह आणि मुलायम सिंह यांच्यासोबतही असाच प्रकार घडला आणि हा विश्वास अधिक दृढ झाला.
-
मात्र आता योगींनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत या नकोश्या परंपरेलाही छेद दिलाय.
-
कल्याण सिंह यांची खुर्ची गेल्यानंतर राजनाथ सिंह हे भाजपाचे मुख्यमंत्री झाले.
-
२००० साली राजनाथ यांना नोएडाला जाण्याची संधी होती. मात्र ते नोएडाला गेले नाही.
-
डीएनडी उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यासाठी राजनाथ सिंह हे नोएडाला न येता दिल्लीमधूनच त्यांनी उद्घाटन केलं. मात्र नंतर त्यांचीही खुर्ची गेली.
-
त्यानंतर २०११ मध्ये मायावती नोएडाला आल्या आणि २०१२ मध्ये त्यांची सत्ता गेली.
-
नंतर मुख्यमंत्री झालेले अखिलेश यादव कधी नोएडाला आले नाहीत.
-
अनेकांनी नोएडा दौरा आणि पराभव एका गोष्टीबद्दलच्या चर्चेमुळे आणि पराभवाला घाबरुन अखिलेश नोएडाला मुख्यमंत्री असताना आले नाहीत असं म्हणतात.
-
मुख्यमंत्री आदित्यनाथ हे अनेकदा नोएडाला आले आहेत.
-
वेगवेगळ्या कार्यक्रमांची उद्घाटनं आणि राजकीय कारणांसाठी मागील पाच वर्षात योगींनी अनेकदा नोएडाचा दौरा केलाय.
-
त्यामुळेच आता या नकोश्या योगायोगामध्ये योगींचंही नाव जोडलं जातं की ते हा सारा प्रकार खोडून काढतात याबद्दल उत्तर प्रदेशच्या राजकारणात चर्चा सुरु होत्या.
-
मात्र पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाने योगी यांचा लोकप्रिय चेहराच पक्षाचा चेहरा म्हणून निवडला.
-
सलग दुसऱ्यांना उत्तर प्रदेशच्या जनेतेनं योगींच्या बाजून कौल दिलाय यावर केवळ औपचारिक शिक्कामोर्तब बाकी आहे.
-
त्यामुळे योगी जेव्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा नोएडा दौरा म्हणजे मुख्यमंत्री पद जाणार हा समज सुद्धा दूर होईल. (सर्व फोटो पीटीआय आणि इंडियन एक्सप्रेसवरुन साभार)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”