-
लष्कराच्या ‘अग्निपथ’ या नव्या भरती योजनेवरून देशभरात गोंधळ सुरू आहे. किमान १४ राज्यातील तरुण रस्त्यावर आले आहेत. यूपी-बिहारसारख्या राज्यांमध्ये आंदोलनांना हिंसक वळण लागले आहे.
-
उत्तर प्रदेशमध्ये रेल्वेच्या डब्यांना आग लावली जात आहेत. सरकारी कार्यालये, भाजप नेते आणि भाजपा कार्यालयांवर दगडफेक केली जात आहे.
-
आता प्रश्न पडतो की फक्त यूपी-बिहार आणि राजस्थानमध्येच जास्त गोंधळ का? याचं उत्तर आम्ही तुम्हाला देतो
-
‘अग्निपथ भरती योजने’अंतर्गत तरुणांना चार वर्षांच्या कालावधीसाठी सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे. भरतीसाठी वयोमर्यादा १७ वर्षे वरून २१ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
-
चार वर्षांच्या सेवेनंतर ७५ टक्के सैनिकांना कर्तव्यातून मुक्त करण्यात येणार आहे. इच्छूक जवानांपैकी जास्तीत जास्त २५ टक्के जवानांना यापुढेही सैन्यात सेवा करण्याची संधी मिळेल.
-
चार वर्षांच्या सेवेनंतर आम्ही पुन्हा बेरोजगार होऊ, असे तरुणांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना पूर्वीप्रमाणेच भरतीची संधी देण्यात यावी अशी मागणी करत देशभरात निदर्शने करण्यात येत आहेत.
-
अग्निपथ योजनेविरोधात अनेक राज्यांमध्ये गदारोळ सुरू असला तरी त्याचा सर्वाधिक परिणाम यूपी आणि बिहारमध्ये दिसून येत आहे.
-
याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लष्कराच्या जमीन, जल आणि हवाई दलाच्या तिन्ही शाखांमध्ये सर्वाधिक सैनिक यूपी आणि बिहारमधून येतात.
-
राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानमधील १.५ लाख तरुण भारतीय सैन्यात वेगवेगळ्या पदांवर तैनात आहेत. बिहार तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथील १.०२ लाख तरुण सैन्यात आहेत.
-
पंजाब चौथ्या क्रमांकावर आहे. पंजाबमधील ९४ हजार ७२३ तरुण भारतीय लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये सेवा देत आहेत.
-
आकडेवारीनुसार, या पाच वर्षांत उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक ३७ हजार ४५९ जवानांची भरती करण्यात आली.
-
पंजाबमधून २८ हजार ३०६, राजस्थानमधून २५ हजार ३९९, महाराष्ट्रातून २४ हजार १०३, बिहारमधून १६ हजार २८१ तरुण सैन्यात भरती झाले.
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”