-
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीनंतर समर्थक आमदारांसह गुजरातमधील सूरतची वाट धरत बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याचं स्पष्ट दिसत आहे. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)
-
शिवसेनेतील ३३ आणि अपक्ष सात आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा नेते एकनाथ शिंदेंनी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)
-
गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असल्यामुळे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याचं बोललं जात आहे. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)
-
परंतु शिवसेनेच्या नेत्यांनी बंड पुकारल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)
-
याआधीही अनेक नेत्यांनी शिवसेनेला असा धक्का दिला आहे. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)
-
१९९१ मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेविरुद्ध पहिल्यांदा बंड पुकारले होते. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
विधिमंडळाच्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात भुजबळ यांनी १८ आमदारांसह बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.(फोटो : छगन भुजबळ/ इन्स्टाग्राम)
-
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडत स्वतंत्र पक्ष स्थापन केला तेव्हा छगन भुजबळही त्यांच्यासोबत बाहेर पडले.(फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
आता ते राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील अन्न पुरवठा मंत्री आहे. (फोटो : छगन भुजबळ/ इन्स्टाग्राम)
-
भुजबळांनंतर नवी मुंबईतील शिवसेनेचे नेते गणेश नाईक यांनी बंडाचे निशाण फडकविले. (फोटो : गणेश नाईक/ इन्स्टाग्राम)
-
गणेश नाईक हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत लाडके होते.(फोटो : गणेश नाईक/ इन्स्टाग्राम)
-
शिवसेना सोडल्यानंतर नाईकांनी आधी स्वतंत्र संघटना व नंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला.आता ते भाजपाचे आमदार आहेत. (फोटो : गणेश नाईक/ इन्स्टाग्राम)
-
बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्रे दिल्यानंतर नारायण राणे आणि राज ठाकरे या दोन नेत्यांची लागोपाठ बंड झाली.(फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
राणे यांनी शिवसेनेला उघडपणे आव्हान दिले होते.
-
शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा राजकीय प्रवास करणाऱ्या नारायण राणेंनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
२०१७ साली त्यांनी स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. २०१८ मध्ये नारायण राणेंनी उघडपणे भाजपाला पाठिंबा दर्शविला. नारायण राणे आता भाजपाचे कॅबिनेट मंत्री आहेत. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
शिवसेनेची धुरा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे गेल्यानंतर त्यांचे चुलत भाऊ राज ठाकरे यांनी २००५ साली शिवसेनेला रामराम ठोकत नवीन पक्षाची घोषणा केली. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
राज ठाकरे यांच्या बंडानंतर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते पक्षातून बाहेर पडले.(फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
२००६ साली राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन केला. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
महाराष्ट्रातील विरोधी पक्ष म्हणून मनसे कार्यरत आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर राजसमर्थक असलेले मुलुंडमधील शिशिर शिंदेदेखील पक्षातून बाहेर पडले होते. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरूद्ध पुकारलेले बंड बाळासाहेब गेल्यानंतरचे पहिले आणि मोठे बंड मानले जात आहे. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)
-
या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारसोबतच शिवसेनाही मोठ्या संकटात सापडली आहे. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)
-
त्यामुळे आता पुढे राज्यात कोणती मोठी राजकीय घडामोड होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले आहे. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम) (हेही वाचा : दोन मुलांचा अपघाती मृत्यू आणि राजकारण सोडण्याचा निर्णय; एकनाथ शिंदेंच्या आयुष्यातील हृद्यद्रावक प्रसंग )
![Jasprit Bumrah Ruled Out of Champions Trophy 2025 Due to Lower Back Injury](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Jasprit-Bumrah-Ruled-out-of-Champions-Trophy.jpg?w=300&h=200&crop=1)
Champions Trophy: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर, भारताला मोठा धक्का; BCCIने बदली खेळाडूची केली घोषणा