-
उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात मोसमी पावसाचा जोर वाढला आहे.
-
अतिवृष्टीमुळे आतापर्यंत २१ बळी गेले आहेत.
-
विदर्भातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती कायम असून हवामान खात्याने १२ जुलैपर्यंत अतिवृष्टी तर १३ व १४ जुलैला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
-
अनेक गावांना सतर्क करण्यात आले आहे. पूर्व विदर्भात एकूण १२ तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
-
गडचिरोली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली दौऱ्यावर आहेत.
-
यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावर काही काळ थांबून त्यांनी प्रत्यक्ष पूरपरिस्थितीची पाहणी केली.
-
जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक विशेष बैठक गडचिरोली जिल्हा नियोजन भवनात पार पडली.
-
दरवर्षी पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
-
तसेच अशा गावांबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.
-
जिल्हाधिकारी संजय मीना व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पाणीपातळी आणि त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.
-
गेल्या तीन दिवसांपासूनू विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत जोरदार पाऊस कोसळत आहे. नद्यांना पूर आला आहे.
-
विदर्भातील गोसेखुर्द आणि बेंबळा प्रकल्पाची दारे उघडण्यात आली असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
-
येत्या ४८ तासांत मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकणात आणि विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून राज्यात अनेक ठिकाणी बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
-
पूरस्थिती आणि आपत्कालीन मदतीसाठी प्रशासनाकडून राज्यातील आठ जिल्ह्यांत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (एनडीआरएफ) १३ तुकड्या, तर राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (एसडीआरएफ) दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस / ट्विटर)

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल