-
मी ओबीसी समाजामुळेच घडलो आहे, असे प्रतिपादन करीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या नागपूर विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसींचे प्रमाण सर्वाधिक असून त्यांच्यामुळेच मी निवडून येत आहे, असे स्पष्ट केले.
-
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नवी दिल्लीत झालेल्या परिषदेस केंद्रीय मंत्री कपिल पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आदी नेते उपस्थित होते.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार ओबीसींच्या हक्कांचे रक्षण करेल, असे सांगून फडणवीस म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची निर्मिती केली.
-
आमच्या सरकारच्या कार्यकाळात ओबीसीसंदर्भात घेतलेले २२ पैकी २१ निर्णय मुख्यमंत्री म्हणून मी घेतले होते.
-
ओबीसींचे राजकीय आरक्षण सत्ता आल्यावर चार महिन्यात परत न आणल्यास संन्यास घेईन, असे म्हटले होते. मी माझा शब्द पाळला.
-
पंतप्रधानांची कोणतीही जात नसते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजातील आहेत.
-
केंद्र सरकारमधील ४० टक्के मंत्री ओबीसी समाजातील आहेत.
-
त्याचबरोबर राष्ट्रीय कोट्यातून आता ओबीसी डॉक्टर तयार होत आहेत.
-
यासाठी अनेक वर्षांपासून मागणी होत होती.
-
ती पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
-
(सर्व फोटो सौजन्य : देवेंद्र फडणवीस / ट्विटर)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”