-
प्रत्येकामध्ये देशसेवेची तळमळ असते. पण एखादी व्यक्ती आपली मोठ्या पगाराची नोकरी सोडून गेल्याचे क्वचितच घडते.
-
मात्र, राजस्थानचे रहिवासी प्रेम प्रकाश मीणा हे त्याला अपवाद आहे. प्रेम प्रकाश मीणा यांनी नोकरी सोडून देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. आज ते आयएएस अधिकारी आहेत.
-
IAS प्रेम प्रकाश मीना हे राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी जयपूरमधून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केले.
-
त्यानंतर त्यांनी आयआयटी मुंबईतून एमटेक केले आणि अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय तेल आणि गॅस कंपन्यांमध्ये काम केले. पण २०१५ मध्ये ते देशात परतले आणि त्यांचा युपीएससीचा प्रवास सुरू झाला.
-
प्रेम प्रकाश मीना यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीची खडतर परीक्षा पास केली. मात्र, त्यांना इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून पोस्टिंग मिळाली होती.
-
आयएएस होण्याच्या त्यांची जिद्द असल्याने त्यांनी पुन्हा एकदा परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांना आयएएस मिळाले.
-
IAS प्रेम प्रकाश मीणा यांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली. ज्याचे नाव ‘न्याय तुझ्या दारी’ असे आहे. सध्या त्यांची पोस्टिंग UPSIDA मध्ये अतिरिक्त CEO म्हणून आहे.
-
UPSIDA पूर्वी त्यांची पोस्टिंग बस्ती, हाथरस आणि चंदौली जिल्ह्यात होती. जिथले लोक आजही त्यांच्या कामाचे कौतुक करतात.
-
प्रेम प्रकाश मीणा हे त्यांच्या कामामुळे नेहमीच चर्चेत असतात. लोक त्यांना जेसीबी मॅन म्हणूनही ओळखतात. याशिवाय IAS मीना सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख