-
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने मनसेशी उघड युती न करता छुपे सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
त्यानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासाठी ८०-९० जागा सोडण्याचा भाजपाचा प्रस्ताव आहे.
-
त्यांनी (शिंदे गटाने) मनसेशी युती करून त्यांना आपल्या वाट्यातील जागा द्याव्यात, असा भाजपाचा विचार आहे.
-
न्यायालयीन लढाईत चित्र स्पष्ट झाल्यानंतर योग्य वेळी याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.
-
भाजपा नेते आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर गाठीभेटी वाढल्या आहेत.
-
मात्र, मनसेशी थेट युती करण्याची भाजपाची तयारी नाही.
-
शिवसेना आणि मनसे एकत्र येऊ नये आणि शिवसेनेची मराठी मतपेढी फोडण्यासाठी मनसेचा वापर करावा, अशी भाजपाची रणनीती आहे.
-
भाजपाने शिंदे गटाबरोबर युती करून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे.
-
शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळते का आणि शिवसेनेतील किती नगरसेवक शिंदे गटाकडे येणार, यावर किती जागा सोडायच्या, याविषयी निर्णय होईल.
-
मनसेशी वेगळी युती करून त्यांना जागा सोडणे भाजपाला शक्य नसल्याने छुप्या सहकार्याची रणनीती आखण्यात आली आहे.
-
त्यामुळे शिंदे गटाशी युती म्हणून त्यांना ८०-९० जागा सोडायच्या आणि प्रभागांमधील ताकदीनुसार शिंदे गटाने त्यामधून मनसेच्या उमेदवारांसाठी जागा सोडायच्या, असे तूर्त ठरविण्यात आले आहे.
-
मनसेकडे अनेक जागांवर चांगले उमेदवार नसले तरी शिवसेनेच्या मराठी मतांचे विभाजन करण्यासाठी भाजपा त्यांचा वापर करण्याचे संकेत आहेत.
-
मनसे जिथे निवडून येऊ शकते, त्या जागांवर भाजपा उमेदवार देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिल्याचे समजते.
-
काँग्रेस, समाजवादी व अन्य पक्ष, मुस्लिमबहुल विभाग अशा सुमारे ४० जागांवर भाजपा निवडून येऊ शकत नाही. गेल्या निवडणुकीत भाजपाने १९४ जागा लढवून ८२ जागांवर विजय मिळविला होता.
-
आता शिंदे गट व मनसेसाठी जागा सोडाव्या लागणार आहेत.
-
शिंदे गट व मनसेसाठी जागा सोडाव्या लागणार असल्याने भाजपाला जिंकून येण्याचा टक्का (स्ट्राईक रेट) वाढवावा लागणार आहे, असे ज्येष्ठ भाजपा नेत्याने सांगितले.
-
राज्यातील सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयातील पाच सदस्यीय घटनापीठापुढे २७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.
-
मूळ शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाकडे राहणार, याबाबत निर्णय घेण्याची परवानगी केंद्रीय निवडणूक आयोगास देण्यात आली तर ऑक्टोबरमध्ये निर्णय होऊ शकतो.
-
मात्र, ती न मिळाल्यास निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्ह गोठवून दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्ह मिळू शकते.
-
तसे झाल्यास भाजपाकडून शिंदे गट आणि मनसेसंदर्भातील रणनीती बदलली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
-
शिवसेनेसंदर्भातील याचिकेबरोबरच सर्वोच्च न्यायालयात प्रभाग रचनेविषयीची याचिका प्रलंबित असून, त्यावर निर्णय झाल्यावरच निवडणूक कधी होणार, हे स्पष्ट होणार आहे.
-
सर्वोच्च न्यायालयातील या याचिकांच्या सुनावणीनंतरच रणनीती व जागावाटपाचा निर्णय घेतला जाईल, असे संबंधितांनी सांगितले.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपा हे युतीत निवडणुका लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
-
सध्या जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली नसून, पक्ष योग्य वेळी निर्णय घेईल, असे मुंबई भाजपाचे प्रभारी, आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले.
-
मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय युती किंवा सहकार्य कोणाशी करायचे, कसे करायचे, याबाबत सर्व निर्णय मनसे प्रमुख राज ठाकरे घेतील, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
-
तर मनसेशी युतीची कोणतीही चर्चा झालेली नाही. शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाबरोबरही जागावाटप झालेले नाही, असं भाजपा नेते आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे.
-
शिंदे गट आणि मनसेसंदर्भातील भाजपाच्या या योजनेसंदर्भात प्रतिक्रिया मिळवण्यासाठी शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्याशी अनेकदा संपर्काचा प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.
‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral