-
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सध्या ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.
-
असं असलं तरी ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकरण समोर येण्याच्या दोन दिवस आधीच फडणवीस यांनी आजही आपण उद्धव ठाकरेंना फोन करु शकतो असं विधान केलं होतं.
-
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सध्या ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.
-
विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी हे विधान केलेलं.
-
फडणवीस यांनी सीएनएन न्यूज १८ च्या टाऊन हॉल या विशेष कार्यक्रमात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भातील प्रश्नावर बोलताना हे वक्तव्य केलं.
-
“बीएमसीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही शिंदे गटासोबत लढणार आणि नेतृत्व करणार असं म्हणालात. राज ठाकरेंसोबतही तुमच्या चर्चा होत राहतात असं मी ऐकलं,” असं म्हणत पत्रकार आनंद नरसिम्हन यांनी फडणवीस यांना प्रश्न विचारला.
-
यावर उत्तर देताना फडणवीस यांनी थेट, “हो आमची मैत्री आहे आम्ही चर्चा करतो,” असं सांगितलं.
-
त्यानंतर फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकारण हे दक्षिणेतील राजकारणापेक्षा वेगळं असल्याचं सांगितलं.
-
“महाराष्ट्रातील राजकारण हे दक्षिणेतील राज्यांच्या राजकरणापेक्षा वेगळं आहे,” असं सांगतानाच फडणवीस यांनी हा वेळेपणा काय आहे याबद्दलही भाष्य केलं.
-
“इथल्या (महाराष्ट्रातल्या) राजकारणामध्ये आम्ही एकमेकांचे शत्रू नाही राजकीय विरोधक आहोत,” असं फडणवीस राज यांच्यासंदर्भातील प्रश्नावर म्हणाले.
-
याचाच दाखला देताना पुढे फडणवीस यांनी, “मी आजही फोन उचलून थेट उद्धव ठाकरेंशी बोलू शकतो,” असं विधान केलं.
-
त्यावर मुलाखतकाराने, “करु शकता फोन?” असा प्रश्न आश्चर्याने फडणवीस यांना विचारला.
-
फडणवीस यांनी अगदी आत्मविश्वासाने, “हो हो नक्कीच करु शकतो,” असं सांगितलं.
-
“म्हणजे ते कनेक्शन अजून कट झालेले नाही?” असा प्रश्न फडणवीस यांच्या उद्धव ठाकरेंना मी आजही फोन करु शकतो या विधानावर पत्रकाराने विचारला.
-
“हे पाहा राजकीय नाही तर इतर एखाद्या गोष्टीवर चर्चा करेन त्यांच्यासोबत (उद्धव ठाकरेंसोबत). शरद पवारांसोबत माझ्या चर्चा होतात,” असं फडणवीस म्हणाले.
-
“मी आजही त्यांच्यासोबत फोन करुन चर्चा करु शकतो,” असा उल्लेख पुन्हा एकदा फडणवीस यांनी उद्धव यांच्यासंदर्भात बोलताना केला.
-
“राज ठाकरेही एक नेते आहेत. आमचे मित्र आहेत,” असं फडणवीस पुन्हा राज यांच्यासंदर्भातील प्रश्नाकडे वळताना म्हणाले.
-
“त्यांच्याशी (राज ठाकरेंशी) बोलण्यात काही अडचण आहे असं वाटत नाही,” असं फडणवीस यांनी सांगितलं.
-
“मी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मला फार छान पत्रं लिहिलं होतं,” असंही फडणवीस म्हणाले.
-
तसेच त्या पत्राची आठवण काढताना फडणवीस यांनी, “फार सुंदर शब्द वापरले होते त्यांनी,” असंही सांगितलं.
-
“मी विचार केलेला की त्या पत्राला उत्तर देईन. मात्र मला एवढे चांगले शब्दच सापडले नाहीत,” असं फडणवीस यांनी म्हटलं.
-
“मग मी जाहीर केलं की त्यांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानेन. म्हणून मी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानले,” असं फडणवीस म्हणाले.
-
“लोकशाहीमध्ये ज्या प्रकारचा संवाद हवा असतो तसा यामध्ये आहे,” असं फडणवीस यांनी राज यांच्या घरी दिलेल्या भेटीचा संदर्भ देत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबद्दल म्हटलं.
-
“त्यामुळे या साऱ्या संवादाला राजकीय दृष्टीकोनातून पाहण्याची गरज नाही,” असंही फडणवीस म्हणाले.
-
“भाजपा आणि शिंदेंच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना एकत्र आहे, असंही फडणवीस यांनी पुन्हा स्पष्ट केलं.
-
“आम्ही एकत्र लढणार आहोत हे नक्की आहे,” असं ते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात म्हणाले.
