-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिवाळीनिमित्त पत्रकारांशी गप्पा मारताना राज्यातील राजकारणापासून ते आपल्या आवडीनिवडी, लहानपणीचे किस्से यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
-
राजकीय आणि प्रशासकीय विधानांपेक्षा फडणवीस यांनी त्यांच्या आवडीनिवडींबद्दल आणि सूचक पद्धतीने दिलेल्या उत्तरांचीच जास्त चर्चा रंगली.
-
या अनौपचारिक चर्चेमध्ये फडणवीस यांनी अगदी विद्यमान सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या झोपेपासून ते भूक लागल्यावर होणारी चिडचीड याबद्दलही मनोकळेपणे गप्पा मारल्या.
-
पुन्हा मुख्यमंत्री कधी होणार आणि ‘वर्षां’ निवासस्थानी राहायला जाणार का, या प्रश्नांवर फडणवीस यांनी मिश्कील शैलीत उत्तर दिले.
-
‘मी सध्याच्या ‘सागर’ निवासस्थानी मजेत आहे. ‘वर्षां’ म्हणजे पाऊस आणि पाऊस सागरालाच मिळतो. त्यामुळे ‘वर्षां’वर जाण्याचा कोणताही विचार नाही, असं फडणवीस म्हणाले आणि एकच हशा पिकला.
-
नवी दिल्लीला ‘सागर’च नसल्याने तेथे जाण्याचाही प्रश्नच नसल्याचे त्यांनी सांगितल्यावर हास्यकल्लोळ झाला.
-
मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी होईल, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
-
‘‘महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे, एवढी कटुता आली आहे, हे नाकारता येणार नाही,” अशी कबुली फडणवीस यांनी दिली.
-
फडणवीस यांनी राजकीय मुद्द्यांबरोबरच आपल्या आवडीनिवडींबाबतच्या प्रश्नांना मनमोकळेपणे उत्तरे दिली.
-
मला चांगली उंची असलेल्या नवनवीन गाड्या चालवायला आवडतात, असं फडणवीस म्हणाले. आणि या गाडी प्रेमाचं त्यांना भेटायला येणाऱ्यांशी काय कनेक्शन आहे याबद्दलही त्यांनी भाष्य केलं.
-
त्यामुळे चांगली गाडी घेऊन कोणी भेटायला आले, की मी त्यांना रात्री बोलावतो आणि एक-दीड तास गाडीतून मनसोक्त फिरतो, असं फडणवीस यांनी सांगितलं.
-
तसा मी खादाडच आहे आणि सर्वच पदार्थ आवडतात, असं फडणवीस यांनी आपल्या जेवण्याच्या आवडीनिवडीबद्दल विचारलं असता सांगितलं.
-
भूक लागल्यावर मी बेचैन होतो आणि राग येतो, असं फडणवीस म्हणाले.
-
त्यामुळे रागावल्यावर मला खायला मिळाले की लगेच माझा राग निवळतो, असंही ते म्हणाले.
-
चांगली तब्येत राखण्यासाठी मनात आले की एक-दीड महिना व्यायामशाळेत जातो आणि पुन्हा सहा महिने तिकडे फिरकत नाही, असे फडणवीस म्हणाले.
-
मी शक्यतो पाच तास झोप घेतो. मध्यरात्री तीनला झोपतो आणि सकाळी आठला उठतो, असं फडणवीस यांनी सांगितलं.
-
पण आठवड्यातून दोन-तीनदा सकाळी सात-आठलाच लवकर बाहेर पडावे लागते. त्यामुळे अतिशय कमी झोपेची मला वर्षांनुवर्षे सवय आहे, असं उपमुख्यमंत्री म्हणाले.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या झोपेसंदर्भातही फडणवीसांनी यावेळी विधान केलं.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर रात्री उशिराच काय पहाटेपर्यंत फिरतात, असं फडणवीस म्हणाले.
-
त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे नेमके झोपतात कधी, हा संशोधनाचा विषय आहे, असे फडणवीस म्हणाले.
-
महाराष्ट्राच्या राजकारणातील कटुता राजकीय वैमनस्यापर्यंत गेली आहे. महाराष्ट्राची अशी राजकीय संस्कृती नाही. राजकीय मतभेद असले तरी सर्व पक्षांतील नेते एकमेकांशी बोलू शकतात, असं फडणवीस म्हणाले.
-
तसेच, ही कटुता कशी कमी करता येईल, यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे फडणवीस म्हणाले.
-
ही कटुता कमी करण्यासाठीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिवाळीच्या शुभेच्छा देणार का? असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला.
-
या प्रश्नावर अजून शुभेच्छा दिलेल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले.
दुबईतील वाळवंटात पोहोचलेल्या मराठी अभिनेत्रीला ओळखलं का?