-
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेत फूट पाडली. त्यानंतर राज्यात शिंदे यांनी भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले.
-
मात्र, मी जर आजच्या घडीला उपमुख्यमंत्री असतो, तर सरकारमध्ये राहिलो नसतो.
-
देवेंद्र फडणवीस यांच्या जागी असतो तर मी राजीनामा दिला असता. नव्याने निवडणूक घेतली असती, असे शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार आदित्य ठाकरेंनी म्हटलं. ते ‘इंडिया टुडे’च्या कॉनक्लेव्हमध्ये बोलत होते.
-
आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार आहे. उद्धव ठाकरेंनी आमदारांवर आंधळा विश्वास ठेवला. आम्ही त्यांना आमचे समजत होतो.
-
गेल्या ४० ते ५० वर्षात मुख्यमंत्र्यांकडे राहिलेलं नगरविकास खातं, आम्ही त्यांना देऊ केलं होतं, असे सांगत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्ला केला.
-
आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. आम्हाला वाटलं नव्हतं ते पाठीमागून वार करतील.
-
सत्तेत असताना विरोधी पक्षातील नेत्यांना तडीपारीच्या नोटीसा दिल्या नाहीत. अथवा त्यांच्यावर पाळत ठेवली नाही.
-
मात्र, आमच्या आमदारांवर पाळत ठेवली नाही, ही आमची चूक होती. राजकारण ही घाणेरडी जागा नाही, असेही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं.
-
भाजपा अडीच आणि शिवसेना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची बोलणी झाली होती. त्याच आधारावर युती करण्यावर सहमती झालेली.
-
मात्र, भाजपाने ते आश्वासन पाळलं नाही. नाहीतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते. पण, आमचा तत्वांवर विश्वास आहे, असे आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
-
शिवसेनेचा लोकशाहीवर विश्वास आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करण्याची इच्छा असल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर युती केली.
-
‘प्राण जाय पर वचन न जाय’ वर आमचा विश्वास आहे. पण, एका माणसाच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे गेला, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता केला. ( फोटो साभार – आदित्य ठाकरे ट्विटर )
Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार