-
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज (सोमवार) पुण्यात शिवाजीनगर येथील साखर संकुल येथे मोर्चा काढण्यात आला.(फोटो-अरुल होरएझन आणि सागर कासार)
-
मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
-
या मोर्चामुळे डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन रस्ता, गोखले स्मारक चौक, खंडोजीबाबा चौक भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती.
-
वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.
-
मोटारचालक तसेच दुचाकीस्वारांना कोंडीत अडकून पडावे लागले.
-
साखर निर्यातीला कोटा पद्धतीऐवजी खुल्या परवान्याखाली (ओजीएल) परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली.
-
मोर्चासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. मोठ्या संख्येने शेतकरी मोर्चात सहभागी झाल्याने या डेक्कन जिमखाना भागातील वाहतूक काही काळ बंद ठेवावी लागली.
-
त्यामुळे ड़ेक्कन जिमखाना भागात कोंडी झाली, अशी माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली.
-
पुन्हा FRP एकरकमी करा, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
-
राजू शेट्टी म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारने घेतलेले अनेक निर्णय बदलले.
-
परंतु शेतकरी विरोधी दोन निर्णय घेतले नाहीत. त्यामध्ये उसची रास्त आणि किफायशीर किंमत तथा एफआरपी एकरमी देण्याऐवजी तिचे तुकडे करणारा कायदा विधानसभेत मंजूर केला.
-
यामध्ये सरकारने बदल करून एफआरपी एकरकमी देण्याचा कायदा पुन्हा प्रस्थापित करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी साखर संकुलवर सोमवारी काढलेल्या धडक मोर्चात केली.
-
राज्यातील साखर कारखान्याना एकरकमी एफआरपी देण्यास भाग पाडू, तसेच संघटनेच्या मागण्यांवर शासनाकडून मिळणाऱ्या प्रतिसादावर आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
-
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. संदीप जगताप, स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील यांच्यासह प्रकाश पोफळे, सावकार मादनाईक आदी उपस्थित होते.
-
शेट्टी म्हणाले, मागील वर्षाचे एफआरपी अधिक दोनशे रुपये तातडीने द्यावे, चालू वर्षी एकरकमी एफआरपीसह साडेतीनशे रुपये मिळावेत.
-
ऊस तोडणी मशीनने तुटलेल्या उसाच्या पालापाचोळा वजनात साडेचार टक्क्याएवजी एक टक्का कपात करावी, अशी मागणी त्यांनी केली.
-
उसाच्या वजनात साखर कारखान्यांमध्ये वीस टक्क्यांपर्यंत काटामारी होते, असा आरोपही शेट्टी यांनी केला.
-
आमच्या मागणीवर कोणताही कारखानदार बाहेरून वजन करून आणलेला ऊस स्वीकारत नाहीत.
-
त्यामुळे सरकारने राज्यातील सर्व साखर कारखान्याचे वजन काटे निर्दोष, पारदर्शक व ऑनलाईन पद्धतीने कार्यरत करावेत व काटामारी थांबवावी अशी आमची मागणी आहे.
-
तंत्रज्ञान प्रगत असताना काटामारी करणारे सरकारमध्ये बसले आहेत, असा टोला शेट्टी यांनी लगावला.
-
पूर्वी शेतातून रस्ता गेल्यास बाजारभावाच्या चौपट रक्कम शेतकऱ्यांना मिळत होती.
-
ती महाविकास आघाडी सरकारने निम्म्यावर आणली, त्यामुळे ही कपात मागे घेऊन पूर्वीप्रमाणे चौपट रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी केली.
-
राज्यात दहा ते बारा लाख ऊस तोडणी मजूर असून, या मजुरांच्या मुकादमाला भरघोस कमिशन मिळते.
-
त्यामुळे मुकादम ही व्यवस्था संपवून ऊस तोडणी महामंडळामार्फत मजूर पुरवावेत. अशी मागणी त्यांनी केली.
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती