-
मागील काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युती होण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
-
अशातच आता प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एका कार्यक्रमासाठी एकत्र येणार आहेत.
-
याच पार्श्वभूमीवर आंबेडकर-ठाकरे युती होणार का? असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आला.
-
त्यावर राऊतांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. ते शुक्रवारी (११ नोव्हेंबर) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
-
संजय राऊत म्हणाले, “महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत हातात हात घालून काम करत होते.”
-
“महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी बाबासाहेब आंबेडकर यांची प्रखर मतं आहेत. ती मतं इतिहासात नोंदली गेली आहेत,” असंही राऊतांनी नमूद केलं.
-
संजय राऊत पुढे म्हणाले, “प्रबोधनकार ठाकरेंनी बाबासाहेब आंबेडकरांना संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत सहभागी होण्याची विनंती केली होती. त्यानंतर बाबासाहेब आले.”
-
“हे आजोबांचं नातं आहे आणि आता ते नातवांपर्यंत पोहचलं आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.
-
“प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी माझ्या मनात सदैव आदर राहिला आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.
-
राऊत पुढे म्हणाले, “आंबेडकर ही एक ताकद आहे आणि ठाकरे ही एक ताकद आहे. ही ताकद जेव्हा एकत्र येईल तेव्हा महाराष्ट्राचंच नाही तर देशाच्या राजकारणाचं चित्र बदललेलं दिसेल.”
-
“प्रकाश आंबेडकरांचं व्यक्तिमत्त्व मला माहिती आहे. महाराष्ट्र त्यांच्यावरही तितकाच प्रेम करतो,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
-
“आम्ही एकत्र बसू. स्वतः शरद पवार बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे, शाहू-फुले-आंबेडकर विचारांचे पाईक आहेत,” असं म्हणत राऊतांनी आंबेडकर-पवार मतभेदांचा मुद्दा फेटाळला.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”