-
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील ‘भारत जोडो यात्रा’ शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) शेगावमध्ये आली.
-
या ठिकाणी राहुल गांधींनी शेगावमधील गजानन महाराज देवस्थानाला भेट दिली.
-
या ठिकाणी राहुल गांधींचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
-
राहुल गांधींनी गजानन महाराजांचं दर्शन घेतलं.
-
मनसेने शेगावमधील सभा होऊ देणार नाही असा इशारा दिल्याने मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था होती.
-
राहुल गांधी शेगाव देवस्थानातून थेट सभास्थळी गेले.
-
शेगावमधील भारत जोडोच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
-
या ठिकाणी राहुल गांधींच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली.
-
राहुल गांधींना ऐकण्यासाठी महाराष्ट्रभरातून काँग्रेस कार्यकर्ते शेगावला आले होते.
-
सभेच्या ठिकाणी फेटा बांधून राहुल गांधींचं स्वागत करण्यात आलं.
-
या सभेला उपस्थितांची संख्या इतकी होती की अनेकांच्या बसण्याची गैरसोयही झाली.
-
सभेच्या मंचावर राज्यासह देशभरातील दिग्गज नेत्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
-
भव्य मंचासमोर हजारोंच्या संख्येने जनसमुदाय हजर होता.
-
सभेला इतकी गर्दी होती की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना सभेनंतर कोणतीही गडबड न करता शांततेने जाण्याचं आवाहनही करावं लागलं.
-
राहुल गांधींनी या सभेसमोर भाषण करताना शेतकऱ्यांचं कर्जबाजारीपण आणि कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला.
-
तसेच सरकार शेतकऱ्यांचं कर्म माफ करण्यास नकार देतंय, मात्र उद्योगपतींचे हजारो कोटी रुपये माफ करत असल्याचा आरोप केला.
-
राहुल गांधींनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंवरही भाष्य करत कौतुक केलं.
-
तसेच महाराष्ट्राच्या जनतेने दिलेलं प्रेम आयुष्यभर कधीच विसरणार नाही, अशी भावना व्यक्त केली.
-
सभेनंतर राहुल गांधींनी शेगावच्या देवस्थान भोजनालयात जेवण केलं. (सर्व फोटो – भारत जोडो ट्विटर)
४८ तासांमध्ये ५ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! गजकेसरी राजयोगाचा मिळेल भरपूर लाभ अन् यश, लक्ष्मी ठोठावेल दार