-
मुंबई पालिकेतील कारभारावरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार आदित्य ठाकरेंनी ताशेरे ओढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.
-
पालिकेत टेंडर, ट्रान्सफर आणि टाईमपास सुरु आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या रस्त्यांसाठी ५ हजार कोटींची घोषणा केली होती.
-
पण, मर्जीतील लोकांना त्याचं टेंडर न मिळाल्याने ते रद्द करण्यात आले का?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. पालिकेत चांगले काम करणारे अधिकारी आहेत. त्यांच्या ९० दिवसांत ६ बदल्या करण्यात आल्या.
-
काहींच्या तर २४ तासांत बदली केली गेली. प्रशासनात इतक्या तडकाफडली बदल्या होत नाही. एवढा गोंधळ का होतोय? कोणाच्या आदेशाने हे सुरु आहे?, असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी केला आहे.
-
१ ऑक्टोंबर ते १ जून मध्ये मुंबईतील रस्त्यांची काम केली जातात. पण आता टेंडर रद्द करण्यात आल्याने, नवे टेंडर कधी काढले जाणार.
-
रस्त्यांची कामं कधी होणार आणि कोणत्या रस्त्यांची करण्यात येणार. रस्त्यांसाठी करण्यात आलेल्या पाच हजार कोटींच्या घोषणेमुळे मागील काम रखडली गेली आहे.
-
येत्या पावसाळ्यात जर मुंबईकरांचे त्रास सहन करावा लागला, तर याला घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि पालिकेचे प्रशासन जबाबदार राहिल, असेही आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
-
मुंबई पालिकेतील कामकाजावर कोणाचं नियंत्रण आहे, कोण तेथील प्रशासन चालवत आहे, येथील कामकाजावर कागदांवर कोणाचं कोणाच्या सह्या होत आहेत?, असे सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
