-
युवासेनेचे प्रमुख आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे बुधवारी (२३ नोव्हेंबर) बिहार दौऱ्यावर गेले.
-
यावरून भाजपाचे आमदार नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली.
-
ज्या लालू प्रसाद यांनी राम मंदिरासाठी निघालेला रथ अडवला त्यांच्या मुलाला बाळासाहेब ठाकरेंचा नातू जाऊन बेटणार आहे, असं मत नितेश राणेंनी व्यक्त केलं.
-
तसेच यालाच बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व म्हणतात का? असा प्रश्न विचारत आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला.
-
मुंबईतून बिहारला जाण्याआधी माध्यमांशी बोलताना पत्रकारांनी नितेश राणेंच्या टीकेवर आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला.
-
यावर आदित्य ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करत भाजपाला प्रत्युत्तर दिलं.
-
ज्यांनी पीडीपीसोबत युती केली त्यांनी आमच्यावर टीका करू नये, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपाला प्रत्युत्तर दिलं.
-
तसेच इतर राज्यांमध्ये टीकाकारांसोबत युती केली त्यांनी आमच्यावर टीका करू नये, असंही नमूद केलं.
-
आदित्य ठाकरेंनी बिहार दौऱ्याविषयीही भूमिका स्पष्ट केली. त्याच्या भूमिकेतील महत्त्वाची विधानं खालीलप्रमाणे…
-
मागील अनेक दिवसांपासून तेजस्वी यादव आणि माझी फोनवर चर्चा सुरू आहे – आदित्य ठाकरे
-
आधी आमचं महाराष्ट्रात सरकार होतं आणि ते बिहारमध्ये विरोधी पक्षात होते. तेव्हापासून आम्ही एकमेकांशी सल्लामसलत करत असतो – आदित्य ठाकरे
-
-
आजची मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाली. दुसऱ्या राज्यात प्रचार सुरू आहे म्हणून ही बैठक रद्द करण्यात आली – आदित्य ठाकरे
-
राज्यात ओला दुष्काळ आहे, बेरोजगारी वाढत आहे, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. मात्र, या खोके सरकारच्या मंत्रिमंडळाकडे महाराष्ट्रातील प्रश्नांवर बैठक घेण्यासाठी एक तासही नाही – आदित्य ठाकरे
-
हे सर्व गुजरातमध्ये निवडणुकीत व्यग्र आहेत. आधी यांनी गुजरातमध्ये आमदार पाठवले, नंतर प्रकल्प पाठवले आणि आता मंत्रिमंडळ पाठवलं आहे – आदित्य ठाकरे
-
त्यांनी दुसऱ्या राज्यात प्रचार करावा. त्याबद्दल आक्षेप नाही, मात्र, महाराष्ट्रात ओला दुष्काळ आणि इतर संकटं असताना मंत्रिमंडळ बैठक होणं गरजेचं होतं – आदित्य ठाकरे
-
त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक तास द्यायला हवा होता – आदित्य ठाकरे
-
सर्व छायाचित्र – संग्रहित छायाचित्र

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”