-
महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीत पैलवान सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात सामना रंगला होता.
-
या सामन्यात महेंद्र गायकवाडने सिकंदर शेखवर मात केली होती. मात्र, पंच मारुती सातव यांच्या चुकीच्या निर्णयामुळे सिकंदरला बाहेर पडावं लागलं असल्याची चर्चा समाज माध्यमांत आहे.
-
यानंतर पंच मारुती सातव यांना धमकीचा फोन गेला आहे. याप्रकरणी मारूती सातव यांनी गुन्हाही दाखल केला आहे. यावर सिकंदर शेखने भाष्य केलं आहे.
-
“संग्राम कांबळे हे पहिल्यापासून गंगावेश तालमीचे फेसबुक अकाउंट चालवत आहे. त्यांना कुठेतरी वाईट दिसलं, म्हणून ते बोलले आहेत.”
-
“सगळीकडे रेकॉर्डिग व्हायरल झालं आहे. कोणतीही धमकी देण्यात आली नाही. फक्त तुम्ही असं का केलं ही विचारणा केली आहे,” असं स्पष्टीकरण सिकंदर शेखने दिलं आहे.
-
तसेच, “उपांत्य कुस्तीत टांग ( पूर्ण पाठीवर पडणे ) लागली होती, तिथे व्यवस्थित टांग बसली नाही.”
-
“एका खांद्यावर मी पडलो असून, त्याला ( महेंद्र गायकवाड ) दोन तर मला एक गुण द्यायला पाहिजे होता. असं ४-३ ने कुस्ती चालायला हवी होती. पण, दोनऐवजी ४ गुण समोर पैलवानला देण्यात आलं,” असं सिकंदर शेख म्हणाला.
-
“माझा ताबा असतानाही समोरील पैलवानाला ४ गुणे देणं चुकीचं आहे. सामन्याचे समोरील बाजूचे व्हिडीओ दाखवण्यात आलं. पण, पाठीमागील बाजूचं काहीच दाखवलं गेलं नाही.”
-
“स्पर्धेसाठी पूर्ण तयारी करुन गेलो होतं. यंदा मी महाराष्ट्र केसरी झालो असतो,” असं सिकंदर शेखने म्हटलं आहे.

आता ऑफिसमध्ये पाणी पिण्याची पण भीती! पाहा Viral Video तील किळसवाणी घटना