-
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी महाविकासआघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला.
-
यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या पराभवावरून शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गाफिल राहिल्याचं म्हटलं.
-
या वक्तव्याविषयी शनिवारी (४ फेब्रुवारी) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
-
अजित पवार यांचं म्हणणं त्यांनी आमच्याकडे वारंवार व्यक्त केलं आहे – संजय राऊत
-
उद्धव ठाकरे गाफिल राहिले असं म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी आपल्या लोकांवर जास्त विश्वास ठेवला – संजय राऊत
-
त्यांनी आपल्या विश्वासू लोकांवरच जास्त विश्वास ठेवला – संजय राऊत
-
विश्वासघात हा विश्वासातील माणसाकडूनच होत असतो – संजय राऊत
-
हे अजित पवारांनाही माहिती आहे. त्यांना ते सांगायला नको – संजय राऊत
-
असं असलं तरी आम्हीही या हालचालींची माहिती उद्धव ठाकरेंना देत होतो – संजय राऊत
-
याबाबत फक्त अजित पवार सांगत होते किंवा अन्य लोक सांगत होते असं नाही – संजय राऊत
-
या हालचालींचा सुगावा सगळ्यांनाच लागला होता – संजय राऊत
-
यानंतरही उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं की, हे आपले लोक आहेत, विश्वासाचे लोक आहेत – संजय राऊत
-
ते स्वतःला निष्ठावान, कडवट लोक म्हणवतात. त्यांच्यावर असा अविश्वास दाखवणं योग्य नाही. आपण त्यांच्याशी बोलू, असं उद्धव ठाकरे म्हणत – संजय राऊत
-
शिवसेनेने वारंवार त्यागाची भूमिका ठेवली – संजय राऊत
-
आपल्यामुळे महाविकासआघाडीचं नुकसान होऊ नये, अशी भूमिका घेतली – संजय राऊत
-
आमच्या सर्वांचा राजकीय शत्रू एकच आहे. त्यांचा पराभव झाला पाहिजे – संजय राऊत
-
विधान परिषद निवडणुकीत आम्ही ते करून दाखवलं – संजय राऊत
-
पाच पैकी चार जागा मविआकडे आहे. एक जागा भाजपाने जिंकली आहे. अमरावती आणि नागपूर या दोन महत्त्वाच्या जागा मविआने जिंकल्या – संजय राऊत
-
हा विजय आमच्या एकीमुळे झाला आहे – संजय राऊत
-
कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा मविआ एकत्रित लढेल – संजय राऊत
-
चिंचवडची जागा शिवसेनेने लढावी अशी आमची भूमिका आहे. आग्रह आहे. तरी आम्ही महाविकासआघाडी म्हणून निर्णय घेऊ – संजय राऊत
-
या दोन्ही जागी जिंकण्याची सर्वाधिक संधी कोणाला आहे? हे ठरवलं जाईल. त्यानुसार निर्णय घेतला जाईल – संजय राऊत
-
आमच्यात कोणतेही मतभेद, रस्सीखेच नाही. मविआने जिंकणं हेच आमचं एकमेव ध्येय आहे – संजय राऊत
-
अंधेरीची पोटनिवडणूक आम्ही जिंकलो तेव्हा सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिला – संजय राऊत
-
विधान परिषद निवडणुकीत आम्ही एकमेकांना मदत केली – संजय राऊत
-
कसबा आणि चिंचवडमध्येही आम्ही त्याच प्रेरणेने लढू – संजय राऊत
-
सर्व छायाचित्र – संग्रहित
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO