-
काँग्रेस नेत्या आणि आसामच्या युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. अंकिता दत्ता यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास व्ही. बी. व युवक काँग्रेसचे सचिव वर्धन यादव यांच्यावर छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
-
विशेष म्हणजे श्रीनिवास राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जातात.
-
विशेष म्हणजे याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करूनही यावर अद्याप साधी चौकशी समितीही नेमण्यात आलेली नाही, असंही त्यांनी नमूद केली.
-
यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्या बुधवारी (१९ एप्रिल) एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होत्या. त्यांनी नेमके काय आरोप केले त्याचा हा आढावा…
-
मागील सहा महिन्यांपासून युवक काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. आणि सचिव वर्धन यादव माझा छळ करत आहेत – अंकिता दत्ता
-
वर्धन यादव यांना महिलेचा सन्मान कसा करायचा हे माहिती नाही – अंकिता दत्ता
-
ते मला ‘ये लडकी’ असं म्हणत बोलावतात. ते मला डॉ. अंकिता दत्ता किंवा आसाम युवक काँग्रेसची अध्यक्ष म्हणून संबोधत नाहीत – अंकिता दत्ता
-
मी याबाबत वरिष्ठ नेतृत्वाकडे याबाबत तक्रार केली. मात्र, अद्यापही यावर चौकशी समिती नेमण्यात आली नाही – अंकिता दत्ता
-
रायपुरमधील अधिवेशनादरम्यान मी सभामंडपात प्रवेश करत असताना श्रीनिवास व्ही. बी. समोरून येत होते – अंकिता दत्ता
-
ते मला म्हणाले की, तू काय पिऊन मेसेज करते. तू व्होडका पिते का? – अंकिता दत्ता
-
युवक काँग्रेसचे अध्यक्ष एका राज्याच्या महिला अध्यक्षाबरोबर असं बोलताना पाहून मला धक्का बसला – अंकिता दत्ता
-
धक्का बसल्याने मी शांत राहिले. त्यानंतर मी श्रीनिवास यांनी अशाप्रकारे वर्तन केल्याची तक्रार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे, सरचिटणीसांकडे केली – अंकिता दत्ता
-
हे अगदीच सहन केलं जाऊ शकत नाही – अंकिता दत्ता
-
श्रीनिवास आणि वर्धन यांच्याविरोधात अद्यापही चौकशी समिती नेमलेली नाही ही मुख्य अडचण आहे – अंकिता दत्ता
-
हाच माझ्यासाठी काळजीचा मुद्दा आहे – अंकिता दत्ता
-
मी वारंवार त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे – अंकिता दत्ता
-
ते आता सोशल मीडियावर माझे पोस्टर्स शेअर करत आहेत – अंकिता दत्ता
-
वर्धन यादव यांनी माझा आणि आसाम मुख्यमंत्री हिमांतू शर्मा यांचा फोटो शेअर करत मी त्यांना खूश करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. माझ्याकडे त्याचे स्क्रिनशॉटही आहेत – अंकिता दत्ता
-
म्हणजे एखादी महिला तिच्या स्वसन्मानावर बोलत असेल, ती ज्या छळाला सामोरं जाते त्यावर बोलत असेल, तर पक्षाने अशाप्रकारे प्रतिक्रिया द्यायला हवी का? – अंकिता दत्ता
-
माझे वडील मृत्यूशय्येवर असताना आसाम काँग्रेसचे अध्यक्ष होते – अंकिता दत्ता
-
माझे आजोबा, वडील आणि मी काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत – अंकिता दत्ता
-
आम्हाला पक्ष सोडण्याची गरज नाही – अंकिता दत्ता
-
त्यांना आम्हाला पक्षातून काढायचं असेल, तर त्यांनी काढावं. मात्र, आमचं काँग्रेस पक्षावर प्रेम आहे – अंकिता दत्ता
-
श्रीनिवास आणि वर्धन यांच्यासारख्या लोकांनी पक्ष उद्ध्वस्त केला आहे – अंकिता दत्ता
-
त्यांनी राज्यातील राजकारण उद्ध्वस्त केलं आहे – अंकिता दत्ता
-
महिलेबरोबर अशाप्रकारचं वर्तन करणारा व्यक्ती युवक काँग्रेसचं नेतृत्व कसं करू शकतो? – अंकिता दत्ता
-
ते मला म्हणतात की, ही मुलगी बदनाम झाली आहे – अंकिता दत्ता
-
ते माझ्याविरोधातील ईडी-सीबीआय प्रकरणं उकरत आहेत – अंकिता दत्ता
-
ही प्रकरणं मागील वर्षी ऑगस्टमध्ये सुरू झाली. मी एकटी या प्रकरणांविरोधात लढत आहे – अंकिता दत्ता
-
मला जर भाजपातच जायचं असतं, तर ऑगस्ट त्यासाठी चांगली वेळ होती – अंकिता दत्ता
-
मला वडील नाहीत, मला पती नाही, मी माझी आई आणि तीन बहिणींबरोबर या प्रकरणांचा सामना करत आहे – अंकिता दत्ता
-
आम्ही चुकीचे नाहीत त्यामुळेच आम्ही याच्या विरोधात लढत आहोत – अंकिता दत्ता
-
मात्र, मी पक्षातील लिंगभेदभावाविरोधात तक्रार केल्याने पक्षाने असं वागावं का?” – अंकिता दत्ता
-
एकूणच या प्रकरणामुळे काँग्रेसवर नाचक्कीची वेळ आली आहे.
-
सर्व छायाचित्र – अंकिता दत्ता ट्विटर

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”