-
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याने महाविकासआघाडीत अडचणी निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप केला.
-
यानंतर आता संजय राऊतांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी राऊतांनी तटकरेंना तुम्हीही बोलण्याची हिंमत दाखवा, असं आव्हान दिलं.
-
ते बुधवारी (१० मे) मुंबईत पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
-
सुनील तटकरेंनी राज्याच्या राजकारणाविषयी थोडं समजून घेतलं पाहिजे – संजय राऊत
-
सामना मागील ४० वर्षांपासून राज्यातील राजकारणाविषयी आपलं मत नोंदवत आहे – संजय राऊत
-
त्यांच्याबरोबर इतर कुणी नव्हतं तेव्हा सामनाच त्यांच्या नेत्यांच्या समर्थनार्थ उभा होता – संजय राऊत
-
जर कुणाला त्यांचं मत मांडायचं असेल तर मांडू द्या – संजय राऊत
-
जर त्यांना काही चुकीचं वाटत असेल तर त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी समोर येऊन त्यांची बाजू मांडावी – संजय राऊत
-
आम्ही त्यांना कुठं रोखलं आहे – संजय राऊत
-
मी माझ्या पक्ष, राज्य आणि देशाविषयी बोलतो. यात त्यांचं पोट दुखण्याचं कारण नाही – संजय राऊत
-
मी माझ्या पक्षाची भूमिका आणि मतं मांडतो. त्यांनीही त्यांचं काही मत असेल, विचारसरणी असेल तर मांडावी – संजय राऊत
-
त्यांना कुणीही रोखलेलं नाही. त्यांनी बोलत रहावं, बोलण्याची हिंमत दाखवावी – संजय राऊत
-
चांगली गोष्ट आहे, शरद पवार सामनाला महत्त्व देत नाही म्हणाले. मात्र, मी कुठे म्हणतो सामनाला महत्त्व द्या. शरद पवार आमच्या सर्वांचे नेते आहेत – संजय राऊत
-
सर्व फोटो संग्रहित

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख