-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर अजित पवार गटातील नेते व राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिलेल्या आदेशापासून शिंदे गटाचे नेते व माजी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त कृषी महोत्सवावर प्रतिक्रिया दिली.
-
ते पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
-
मनसेने तोडफोड करायची की आणखी काही हा त्यांचा निर्णय आहे – धनंजय मुंडे
-
लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहेत, मात्र वाईट गोष्टींचा विरोध करण्यासाठी लोकशाहीने आयुधं दिली आहेत. त्याचा वापर झाला पाहिजे – धनंजय मुंडे
-
कुणीही, कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये – धनंजय मुंडे
-
कृषी महोत्सवाबाबत ५७ लाख रुपयांची देयकं देणं बाकी होती. ती देयके कृषी विभागाला द्यायची आहेत – धनंजय मुंडे
-
ही देयके द्यावीत की नाही हे कृषीमंत्र्याला विचारलं जात नाही. हा निर्णय खालच्या पातळीवर अधिकाऱ्यांच्या स्तरावर घेतला आहे आणि देयके दिली आहेत – धनंजय मुंडे
-
शेतकऱ्यांची आत्महत्या केवळ यवतमाळ जिल्ह्यात नाही, तर सर्वदूर महाराष्ट्रात होते. या आत्महत्या आज होत नाहीत. शेतकऱ्यांसमोर असंख्य संकटं आहेत – धनंजय मुंडे
-
शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला तर हा भाव खाली कसा जाईल अशा बातम्या माध्यमं करतात. भाव नाही मिळाला तर टोमॅटो फेकून दिल्याच्याही बातम्या केल्या जातात – धनंजय मुंडे
-
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, शेतकरी आभाळाखाली शेती करणारी एकमेव जात आहे. त्यामुळे निसर्गाचं प्रत्येक संकट शेतकऱ्याला अडचणीत आणतं – धनंजय मुंडे
-
कधी पाऊस, गारपीट, दुष्काळ, पूर अशा सर्व परिस्थितीला शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं. अशा संकटाच्या काळात अल्पकालीन, मध्यम व दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागतील – धनंजय मुंडे
-
शेतकऱ्याला शाश्वत शेतीचा आधार द्यावा लागेल. आम्ही तोच आधार देण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणूनच शेतकऱ्याच्या पिक विम्याचा हिस्सा सरकारने भरला. शेतकऱ्याला एक रुपयाच भरावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशातील १५०० कोटी रुपये वाचले – धनंजय मुंडे (सर्व छायाचित्र संग्रहित)

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका