-
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या चांद्रयान ३ या मोहिमेकडे होतं.
-
चांद्रयान २ अपयशी ठरल्यानंतर चांद्रयान ३ मोहिमेत यश मिळवण्यासाठी इस्रोच्या वैज्ञानिकांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि भारतीयांना तो ऐतिहासिक क्षण पाहता आला.
-
चांद्रयान मोहिमेत संध्याकाळी ५.४४ मिनिटांनी विक्रम लँडर आपली जागा घेतली.
-
चांद्रयान ३ च्या लँडरने २१ वेळा पृथ्वीची आणि चंद्राची १२० वेळा प्रदक्षिणा पूर्ण केली.
-
यात एकूण ५५ लाख किलोमीटरचा प्रवास झाला.
-
चांद्रयान चंद्रपासून २१ किमी अंतरावर असताना दीड किमी प्रति सेकंद अशा वेगाने यान फिरलं.
-
यानंतर त्याचा वेग आणखी कमी करण्यात आला.
-
चांद्रयानाचा वेग शून्य झाल्यानंतर शेवटची २२ सेकंद अत्यंत महत्त्वाची ठरली.
-
भारताचं हे चांद्रयान आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरलं.
-
विक्रम लँडरने चंद्रावर सॉप्ट लँडिंग केलं.
-
विक्रम लँडरचं सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर रँप उघडले आणि त्यातून प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर आले.
-
यासह भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावार सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश ठरला.
-
अलिकडेच रशियाने लूना २५ या मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न केला होता.
-
परंतु, त्यात तांत्रिक बिघाड झाला आणि रशियाची मोहीम अपयशी ठरली.
-
त्यापाठोपाठ भारताची चांद्रयान मोहीम सुरू होती.
-
भारताच्या मोहिमेबद्दल लोकांच्या मनात धाकधूक होती. परंतु, ही मोहीम यशस्वी होईल असा विश्वास इस्रोने व्यक्त केला होता.
-
आम्ही चांद्रयान २ च्या अपयशातून खूप काही शिकलो आहोत असं वैज्ञानिकांनी म्हटलं होतं. भारताचे शास्त्रज्ञ त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासावर खरे उतरले.
-
अनेक अडथळे पार करत भारताचं चांद्रयान आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आहे.
-
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळ यान उतरवणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरला आहे.
-
मोहीम यशस्वी झाल्यानंतर इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भारतवासियांना संदेश देताना म्हणाले, “आपण आता चंद्रावर आहोत.”
-
चांद्रयानाच्या यशस्वी लँडिंगनंतर देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण नव्या भारताच्या जयघोषाचा आहे.
-
समस्यांचा महासागर ओलांडून आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. १४० कोटी लोकांचं स्वप्न आज पूर्ण झालं आहे, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.
-
हा भारताचा शंखनाद आहे. आज प्रत्येक देशवासीयाप्रमाणेच माझंही मन या चांद्रयान मोहिमेशी जोडलं गेलं होतं, असंही मोदींनी नमूद केलं.
-
(छायाचित्र सौजन्य – इस्रो)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”