-
भारताच्या चांद्रयान मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयानाने यशस्वी लँडिंग केलं.
-
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळ यान उतरवणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरला आहे. संपूर्ण देशाची ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.
-
रशिया या देशानेही लूना २५ या मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात तांत्रिक बिघाड झाला आणि ती मोहीम अपयशी ठरली.
-
अशात भारताची चांद्रयान मोहीम ही यशस्वी होईल असा विश्वास इस्रोने व्यक्त केला होता. त्यानुसार ही मोहीम यशस्वी झाली आहे.
-
याच पार्श्वभूमीवर आज आपण चंद्रावर जिवंत राहू शकणाऱ्या काही वनस्पतींबद्दल जाणून घेऊया.
-
अभ्यासातून असे समोर आले आहे की अंतराळातील मर्यादांचा विचार करता तेथे जिवंत राहण्यासाठी अळीवाचे रोप उत्तम पर्याय आहे. कारण या रोपची ऊंची लहान आहे.
-
शास्त्रज्ञांनी चंद्राच्या आभासी आणि नियंत्रित केलेल्या वातावरणात गव्हाची यशस्वी लागवड केली आहे.
-
आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राने मंगळावर असलेल्या परिस्थितीशी जुळणाऱ्या परिस्थितीत बटाट्यांची लागवड केली होती.
-
नासाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर लेट्यूसचे पीक घेतले होते आणि ते चंद्राच्या परिस्थितीतही घेता येऊ शकते.
-
एकपेशीय वनस्पती चंद्राच्या परिस्थितीत बायोरिएक्टरमध्ये उगवता येऊ शकते आणि महत्त्वपूर्ण पोषक आणि ऑक्सिजनचा स्रोत असू शकते.
-
येथे देण्यात आलेली माहिती संशोधन अभ्यास आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.
-
फोटो : भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि Pexels

Kunal Kamra Controversy : “मी जिथे राहत नाही तेथे जाणं म्हणजे…”; कुणाल कामराची सूचक पोस्ट, मुंबई पोलिसांना डिवचलं?