-
बुधवारी सायंकाळी ६.०४ वाजता चांद्रयान-३च्या ‘विक्रम’ लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद अवतरण केले आणि भारताने नवा इतिहास घडवला.
-
चंद्रावर पोहोचण्याची किमया करणारा भारत हा चौथा देश असला तरी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘पाऊल’ ठेवणारा भारत पहिलाच.
-
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अनेक प्रचंड मोठी विवरे आहेत.
-
त्यामुळेच या भागात आतापर्यंत उतरणे एकाही देशाच्या यानाला शक्य झाले नव्हते. (Photo Source – Pawan K Goenka / Twitter)
-
दक्षिण ध्रुवावरील अजस्त्र विविरांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ असल्याचे पुरावे संशोधकांना मिळाले आहेत.
-
या बर्फाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले आणि तो बाहेर काढून वापरणे शक्य झाले, तर भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी त्याचा उपयोग करता येईल.
-
बर्फ वितळवून पिण्यासाठी तसेच उपकरणे थंड करण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल.
-
पाण्याचे विघटन करून इंधन म्हणून हायड्रोजन आणि श्वसनासाठी ऑक्सिजनची निर्मिती करता येईल.
-
विक्रम लँडरवर बसविलेल्या ‘प्रग्यान’ या रोव्हरचा चंद्राच्या पृष्ठभागावरून आता प्रवास सुरू होणार आहे.
-
या रोव्हरच्या साहाय्याने चंद्रपृष्ठावर असलेल्या घटकांचे रासायनिक विश्लेषणही करण्यात येईल.
-
चंद्रपृष्ठावरील घटकांच्या परीक्षण-प्रयोगासाठी ‘लँडर’ आणि ‘रोव्हर’वर वैज्ञानिक प्रयोग-नोंदींसाठीची यंत्रणा (सायंटिफिक पेलोड) आहे.
-
रोव्हरच्या साहाय्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील दगड, माती, विवरे यांचा अभ्यास केला जाणार आहे.
-
चंद्राच्या पृष्ठभागावरील टेकड्या आणि विवरांचे अचूक स्कॅन करण्याचा प्रयत्न या रोव्हरच्या साहाय्याने केला जाणार आहे.
-
या परिसराची छायाचित्रे काढून त्याचा अभ्यास केला जाणार आहे. (Express Photo By Amit Chakravarty)
-
विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर हे एक चंद्र दिवसासाठी (१४ पृथ्वी दिवस) काम करणार आहे. (सर्व फोटो सौजन्य : भारतीय अंतराळ संशोधन संस्था / ट्विटर)
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य