-
मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीचे विधी (२८ फेब्रुवारी) गुजरातमधील जामनगरमध्ये अन्न सेवेने सुरू झाले होते, ज्यामध्ये ५१ हजार स्थानिक लोकांना जेवण देण्यात आले. (PTI)
-
आता पुन्हा एकदा अंबानी कुटुंब गरीब कुटुंबांसाठी पुढे आले असून, वंचित कुटुंबातील ५० गरीब मुलींचे सामूहिक विवाह लावून देत, अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्या विधींना अंबानी कुटुंबाने सुरुवात केली आहे. (PTI)
-
रिलायन्स कॉर्पोरेट पार्क येथे मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील ५० हून अधिक जोडप्यांसाठी भव्य सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. (PTI)
-
या सामूहिक विवाह सोहळ्यात वधू-वर पक्षातील सुमारे ८०० लोक सहभागी झाले होते. या खास प्रसंगी नीता अंबानी आणि मुकेश अंबानी त्यांच्या कुटुंबीयांसह उपस्थित होते. यावेळी अंबानी कुटुंबाने येत्या काळात असे अनेक सामूहिक विवाह आयोजित करण्याचा संकल्प केला आहे. (PTI)
-
सामूहिक विवाह सोहळ्यानंतर नीता अंबानी म्हणाल्या, ‘या सर्व नवविवाहित जोडप्यांना पाहून त्यांना खूप आनंद होत आहे. त्या म्हणाल्या, “मी एक आई आहे आणि आईला आपल्या मुलांचे लग्न पाहून खूप आनंद होतो. आजपासून राधिका आणि अनंतच्या लग्नाचे सर्व विधी सुरू होत आहेत. मी भाग्यवान आहे की मी येथे आले आहे हे सर्व पाहते आहे, या सर्वांचं जीवन आनंदी होवो.” (PTI)
-
इतकंच नाही तर आई-वडील आपल्या मुलीला लग्नानंतर निरोप देताना काही भेटवस्तू देण्याची परंपरा आपल्याकडे आहे. या गोष्टीची दखल घेऊन तशी व्यवस्था अंबानी कुटुंबाने केली होती. प्रत्येक वर-वधू जोडप्याला मंगळसूत्र, लग्नाची अंगठी आणि नाकातील नथ यासह विविध सोन्या-चांदीचे दागिने भेट स्वरुपात देण्यात आले. (PTI)
-
याशिवाय अंबानी कुटुंबाच्या वतीने प्रत्येक वधूला १ लाख १ हजार रुपयांचा धनादेश ‘स्त्रीधन’ म्हणून देण्यात आला. प्रत्येक जोडप्याला वर्षभरासाठी पुरेल इतकं किराणा सामान आणि घरगुती वस्तू देखील भेट देण्यात आल्या, ज्यामध्ये भांडी, गॅस स्टोव्ह, मिक्सर, गाद्या, उशा इत्यादी ३६ प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. (PTI)
-
त्याचबरोबर या सामूहिक विवाहात सहभागी झालेल्या लोकांसाठी अंबानी कुटुंबाकडून भव्य मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यात वारली जमातीचे पारंपारिक तारपा नृत्य सादर करण्यात आले. (PTI)
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा १२ जुलैपासून सुरू होणार आहे. पहिला सोहळा शुभ विवाह असेल, १३ जुलै हा शुभ आशीर्वादाचा दिवस असेल. तर १४ जुलै रोजी रिसेप्शन असेल. (PTI) हेही पाहा- PHOTOS : संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाटात! पाहा मनमोहक छायाचित्रे…
![Natasa Shares Cryptic Video As Hardik Pandya Returns](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/hardik_natasha.jpg?w=300&h=200&crop=1)
हार्दिक पंड्याची पत्नी नताशाने टीम इंडिया भारतात येताच केलेली पोस्ट पाहून घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; लिहिलं, “तेव्हा माझं रक्षण..”