-
देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये मान्सूनचा पाऊस पडत आहे. मात्र, अनेक राज्यांमध्ये पाऊस आपत्ती ठरत आहे.
-
केरळमधील वायनाडमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेने आपल्याला भारतात भूतकाळात झालेल्या अशाच भयंकर दुर्घटनांची आठवण करून दिली आहे.
-
अशाच नैसर्गिक आपत्तींनी केवळ मालमत्तेचे प्रचंड नुकसान केले नाही तर हजारो लोकांचे प्राणही घेतले. निसर्गाच्या कोपामुळे कधी आणि किती लोकांना जीव गमवावा लागला ते जाणून घेऊया.
-
गुवाहाटी भूस्खलन (१९४८)
सप्टेंबर १९४८ मध्ये, आसाममधील गुवाहाटी येथे भूस्खलनात संपूर्ण गाव गाडले गेले, ज्यामध्ये ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. -
दार्जिलिंग भूस्खलन (१९६८)
ऑक्टोबर १९६८ मध्ये, पुरामुळे पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमध्ये भूस्खलन झाले आणि ६० किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग ९१ भागांमध्ये उद्ध्वस्त झाला. या भीषण अपघातात १००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. -
मॅपला भूस्खलन (१९९८)
ऑगस्ट १९९८ मध्ये, अविभाजित उत्तर प्रदेशातील मापाला येथे सलग सात दिवसांच्या भूस्खलनात ३८० हून अधिक लोक मारले गेले आणि संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाले. -
केदारनाथ भूस्खलन (२०१३)
जून २०१३ मध्ये, मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे ५,७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि ४,२०० हून अधिक गावे जलमय झाली. -
माळीण भूस्खलन (२०१४)
जुलै २०१४ मध्ये अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील माळीण गावात भूस्खलन होऊन १५१ लोकांचा मृत्यू झाला होता. -
मणिपूर भूस्खलन (२०२३)
ऑगस्ट २०२३ मध्ये, अतिवृष्टीमुळे मणिपूरमध्ये भूस्खलन झाले ज्यामध्ये ४० हून अधिक लोक मरण पावले. -
वायनाड भूस्खलन (२०२४)
केरळच्या वायनाडमध्ये ३० जुलै रोजी तीन मोठ्या भूस्खलनाच्या घटना घडल्या. भूस्खलनात वायनाडमधील चार गावे ढिगाऱ्याखाली गेली असून, लोकांना वाचवण्यासाठी सातत्याने बचावकार्य सुरू आहे. बचाव कार्याच्या विविध टप्प्यांमध्ये मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ३०८ जणांचा मृत्यू झाला आहे.
(सर्व फोटो: रॉयटर्स)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख