-
दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगामजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान २६ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
-
या गंभीर हल्ल्यामुळे काश्मीरमध्ये याआधी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची दृश्ये डोळ्यासमोर उभी राहतात.
-
१. २२ मार्च १९९७ – संग्रामपुरा हत्याकांड
१९९७ मध्ये बडगाम जिल्ह्यातील संग्रामपुरा गावात दहशतवाद्यांनी आठ निष्पाप नागरिकांना गोळ्या घालून ठार मारले होते. -
२. २६ जानेवारी १९९८ – वांधामा हत्याकांड
१९९८ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या रात्री श्रीनगरच्या वांधमा गावात २३ काश्मिरी पंडित निशाण्यावर होते. या हल्ल्याने देशभरात खळबळ उडाली.
(फोटो सौजन्य : काश्मीर लाइफ ) -
३. १७ एप्रिल १९९८ – प्रणकोट-डक्कीकोट हत्याकांड
१९९८ मध्ये उधमपूर (आता रियासी जिल्हा) येथील दोन गावांमध्ये महिला आणि मुलांसह २९ हिंदूंची हत्या करण्यात आली. काहींचे शिरच्छेदही करण्यात आले. -
४. १९ जून १९९८ – चापनारी हत्याकांड
१९९८ मध्ये दोडा जिल्ह्यातील चापनारी गावात लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी २६ हिंदूंची हत्या केली होती. (फोटो सौजन्य : जनसत्ता) -
५. २० मार्च २००० – छत्तीसिंगपोरा घटना
२००० मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या भारत भेटीच्या एक दिवस आधी, अनंतनागच्या छत्तीसिंगपुरा गावात ३५ शिखांची हत्या करण्यात आली होती. -
६. १-२ ऑगस्ट २००० – अमरनाथ यात्रेवर हल्ला
२००० मध्ये अनंतनाग आणि दोडा जिल्ह्यातील पाच ठिकाणी झालेल्या हल्ल्यांमध्ये ३२ अमरनाथ यात्रेकरू आणि कामगारांसह १०५ लोक मारले गेले. -
७. ९ फेब्रुवारी २००१ – कोट चारवाल हत्याकांड
२००१ मध्ये राजौरी जिल्ह्यातील चालवालकोट गावात दहशतवाद्यांनी १५ बकरवाल (भटक्या समुदायाच्या) लोकांना ठार मारले होते. -
८. १४ मे २००२ – कालुचक हल्ला
२००२ मध्ये पाकिस्तानातील तीन दहशतवाद्यांनी जम्मू-पठाणकोट महामार्गावर एका बसमध्ये सात प्रवाशांची हत्या केली आणि नंतर कालुचक लष्करी तळावर हल्ला केला, ज्यामध्ये १० मुले आणि पाच सैनिकांसह २३ लोक ठार झाले. (फोटो सौजन्य : द इकॉनॉमिस्ट) -
९. ३० जुलै आणि ६ ऑगस्ट २००२ – नुनवान अमरनाथ कॅम्पवर हल्ला.
२००२ मध्येच लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी पहलगाममधील नुनवान बेस कॅम्पवर दोनदा हल्ला केला, ज्यामध्ये एकूण ११ भाविक ठार झाले आणि ३० जण जखमी झाले. -
१०. २३ मार्च २००३ – नदी मार्ग हत्याकांड
२००३ मध्ये पुलवामा जिल्ह्यातील नदी मार्ग गावात दहशतवाद्यांनी २४ काश्मिरी पंडितांची हत्या केली होती. -
११. १० जुलै २०१७ – अमरनाथ यात्रेवर हल्ला
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला झाला ज्यामध्ये आठ भाविकांचा मृत्यू झाला. हा हल्ला २०१७ मध्ये झाला होता. -
१२. १ जानेवारी २०२३ – डांगरी हत्याकांड
२०२३ मध्ये राजौरी जिल्ह्यातील डांगरी गावात दोन दहशतवाद्यांनी गोळीबार आणि आयईडी स्फोटात दोन अल्पवयीन मुलांसह सात हिंदू नागरिकांना ठार मारले. (फोटो सौजन्य : द निऊ इंडियन एक्सप्रेस ) -
१३. ९ जून २०२४ – रियासी बस हल्ला
गेल्या वर्षी शिवखोरीहून कटरा येथे परतणाऱ्या भाविकांनी भरलेल्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात नऊ भाविकांचा मृत्यू झाला आणि ४२ जण जखमी झाले.(फोटो सौजन्य : द इकॉनॉमिस्ट )
( Photo Credits : Pinterest)