-
काश्मीरमध्ये (Kashmir) गेल्या सहा वर्षांतील सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) झाला असून या वेळी एक पाऊल पुढे जात प्रथमच पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले आहे.
-
पहलगाममधील (Pahalgam) ‘मिनि स्वित्झर्लंड’ (Mini Switzerland) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात मंगळवारी अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले.
-
पहलगाम हल्ल्यात मंगळवारी ठार झालेले संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने या तिघा मावसभावांचे मृतदेह बुधवारी शहरात (Dombivali) आणण्यात आले.
-
भागशाळा मैदानातून फुलांनी सजविलेल्या ट्रकमधून अंत्ययात्रा काढण्यात आली.
-
यावेळी कुटुंबीयांनी फोडलेल्या हंबरड्याने सर्वच उपस्थित गहिवरून गेले.
-
दत्तनगर येथील शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
-
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नेते उपस्थित होते.
-
हल्ल्यात तीन भाऊ मारले गेलेल्या डोंबिवलीतील कौस्तुभ लेले यांनी सरकारच्या भपकेबाजपणाला बुधवारी लक्ष्य केले.
-
ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याची स्वप्ने नंतर दाखवा, आधी भारतीय नागरिकांच्या आयुष्यात सुरक्षित जीवनाचे ‘अच्छे दिन’ येतील हे बघा अशा शब्दांत त्यांनी आपली उद्विग्नता ‘लोकसत्ता’ला दिलेल्या प्रतिक्रियेत व्यक्त केली.
-
भपकेबाजपणा, ब्रॅन्डिंग करणे सोडा… बाता करताना देशातील नागरिक किती सुरक्षित आहेत, हेच या हल्ल्यामुळे स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले.
-
(सर्व फोटो सौजन्य : दीपक जोशी/लोकसत्ता)
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…