-
मध्यप्रदेशच्या हरदामध्ये मंगळवारी रात्री दोन एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना भीषण अपघात झाला.
-
कामायनी एक्स्प्रेस मुंबईहून वाराणसीकडे निघाली होती. जोरदार पाऊस असल्याने माचक नदीवरचा पूल व त्यावरील रेल्वेरूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले होते.
-
हे रूळ ओलांडतानाच कामायनी एक्स्प्रेसचे सहा ते सात डबे रुळावरून घसरले.
-
त्यानंतर काही वेळाने जबलपूरहून मुंबईकडे येणाऱ्या जनता एक्स्प्रेसचे इंजिन आणि तीन डबेही त्याच ठिकाणी रुळावरून घसरले.
-
अपघातानंतर दोन्ही गाड्यांचे काही डबे पाण्याखाली गेले असून त्यात अनेक प्रवासी अडकले आहेत.
-
अत्यंत भीषण अशा या अपघातात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली असून ३०० हून अधिक जणांना वाचविण्यात यश आल्याचे समजते. घटनास्थळी रेल्वेच्या बचाव पथकाकडून मदत व बचावकार्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
-
कामायनी एक्स्प्रेस मुंबईहून वाराणसीकडे निघाली होती. जोरदार पाऊस असल्याने माचक नदीवरचा पूल व त्यावरील रेल्वेरूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. हे रूळ ओलांडतानाच कामायनी एक्स्प्रेसचे सहा ते सात डबे रुळावरून घसरले.
-
जबलपूरहून मुंबईकडे येणाऱ्या जनता एक्स्प्रेसचे इंजिन आणि तीन डबेही त्याच ठिकाणी रुळावरून घसरले.
-
मृत्युमुखींच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची मदत रेल्वे मंत्रालयाने जाहीर केली आहे, तर गंभीर जखमींना ५० हजार आणि किरकोळ जखमींना २५ हजार रुपये दिले जाणार आहेत.
-
या अपघातामुळे मुंबई-इटारसी रेल्वे मार्गावरील गाड्यांवर परिणाम झाला असून चार गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर इतर गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार