-
-
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतोय.
-
महेंद्रसिंह धोनीनंतर विराटकडे भारतीय संघाची धुरा सोपवण्यात आली आणि त्यानेही ती आतापर्यंत चांगली निभावली.
-
मात्र काही सामन्यांमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला पराभवाचाही सामना करावा लागला आहे.
-
मात्र आतापर्यंत भारतीय संघात असेही काही खेळाडू आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकदाही पराभव स्विकारलेला नाही. आज आपण याच कर्णधारांबद्दल जाणून घेणार आहोत.
-
१) अनिल कुंबळे – भारताचा दिग्गज फिरकीपटू म्हणून ओळख असलेल्या अनिल कुंबळेने आपल्या कारकिर्दीत कसोटी संघाचं नेतृत्व केलं आहे. मात्र वन-डे संघात त्याला मर्यादीत संधी मिळत गेल्या. २००२ साली चेन्नईत खेळवण्यात आलेल्या इंग्लंडविरुद्धच्या वन-डे सामन्यात अनिल कुंबळे भारताचा कर्णधार होता.
-
या सामन्यात भारतीय संघ ४ गडी राखून जिंकला होता. यानंतर अनिल कुंबळेला वन-डे टीममध्ये कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली नाही. पण आपल्या एकमेव सामन्यात अनिलने भारताला विजय मिळवून दिला.
-
-
यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध एका सामन्यातही गंभीर भारताचा कर्णधार होता, ज्यात भारताने विजय मिळवला. आतापर्यंत ६ सामन्यांपैकी ६ सामन्यात गौतम कर्णधार म्हणून यशस्वी ठरला आहे.
-
३) अजिंक्य रहाणे – २०१५ साली भारतीय संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्यात अजिंक्य भारतीय संघाचा कर्णधार होता. या मालिकेत भारताने अजिंक्यच्या नेतृत्वाखाली तिन्ही वन-डे सामने जिंकले होते. मात्र काही कालावधीनंतर अजिंक्यला आपलं वन-डे संघातलं स्थान कायम राखता आलं नाही.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ