-
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्वच लढती रोमहर्षक होत आहेत. मात्र आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी ठरलेला मुंबई इंडियन्स संघ या हंगामात कठीण काळातून जातोय.
-
या संघाला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. मुंबईने आतापर्यंत सलग आठ सामने गमावले आहेत.
-
आयपीएलच्या इतिहासामध्ये याआधी अशीच खराब कामगिरी अनेक संघांनी केलेली आहे. २००९ च्या हंगामामध्ये केकेआर या संघाने नऊ सामने गमावले होते.
-
दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या नावावर अशाच प्रकारची खराब कामगिरी आहे. या संघाने २०१४ साली नऊ सामने गमावले होते.
-
पुणे वॉरियर्स इंडिया या संघानेही २०१२ साली खराब कामगिरी केली होती. या हंगामात पुणे संघाला नऊ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.

पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील पर्यटकाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, मुलावर वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ