-
यूएईमध्ये सध्या आशिया चषक स्पर्धेची धूम आहे. या स्पर्धेतील सर्वच सामने अटीतटीचे होत आहेत.
-
आगामी ४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत.
-
याआधी या दोन्ही संघांत २८ ऑगस्ट रोजी लढत झाली होती. हा सामना चांगलाच रोमहर्षक झाला होता.
-
या सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता.
-
या सामन्यात भारताचे अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या या जोडीने धडाकेबाज फलंदाजी करत विजय खेचून आणला होता.
-
येत्या ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या लढतीत विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत.
-
असे असताना रवींद्र जडेजा दुखापतीमुळे या स्पर्धेच्या बाहेर पडला आहे.
-
रवींद्र जडेजा हा अष्टपैलू खेळाडू असून त्याचे संघात नसणे म्हणजे चिंतेची बाब असल्याचे म्हटले जात आहे.
-
त्याने २८ ऑगस्ट रोजी झालेल्या भारत-पाक सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केली होती. हार्दिक पंड्याला साथ देत त्याने २९ चेंडूंमध्ये ३५ धावा केल्या होत्या.
-
जडेजाच्या या खेळीमुळे भारताला विजय सोपा झाला होता. ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत-पाक सामन्यातही तो अशीच कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
-
मात्र आता तो दुखापतीमुळे स्पर्धेच्या बाहेर पडल्यामुळे संघात कोणाला संधी दिली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
-
जडेजाची कमी भरून काढणाऱ्या खेळाडूला या सामन्यात संधी दिली जाऊ शकते.

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO