-
शनिवारी (२ सप्टेंबर) आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक शानदार सामना खेळला गेला. ज्यामध्ये पावसाने खेळात व्यत्यय आणला आणि चाहत्यांची निराशा केली. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
पण चाहत्यांनी निराश होण्याची गरज नाही. कारण १० सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा एकदा आमनेसामने येऊ शकतात. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
२ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान सामना रद्द होताच पाकिस्तान सुपर-4 साठी पात्र ठरला आहे. सुपर-4 साठी पात्र होण्यासाठी, भारताला स्पर्धेतील आपला पुढील सामना जिंकावा लागेल, जो ४ सप्टेंबर रोजी नेपाळविरुद्ध खेळला जाईल. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह श्रीलंकेहून मुंबईत परतला आहे. पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कँडी येथे सोमवारी (४ सप्टेंबर) होणाऱ्या नेपाळविरुद्धच्या सामन्यात तो खेळू शकणार नाही. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
कौटुंबिक कारणांमुळे बुमराह मायदेशी परतला असून काळजी करण्यासारखे काही नाही, असे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पावसामुळे त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
नेपाळविरुद्ध विजयाची नोंद करून टीम इंडिया सुपर-4मध्येही पोहोचेल. भारत आणि पाकिस्तानचे संघ अ गटात आहेत. पात्रता संपल्यानंतर दोन्ही संघ अनुक्रमे ए-2 आणि ए-1 मध्ये पोहोचतील. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
गटात अव्वल स्थान पटकावल्यानंतरही टीम इंडिया ए-2 वरच राहील. सुपर-4 टप्प्यात, १० सप्टेंबर रोजी, ए-1 आणि ए-2 यांच्यात सामना पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
ज्यामध्ये पाकिस्तान एक संघ म्हणून पोहोचला आहे. आता टीम इंडियाने नेपाळला पराभूत करताच १० सप्टेंबरला आणखी एका भारत-पाक सामन्याचा निर्णय होणार आहे. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
यानंतर फायनलमध्येही भारत आणि पाकिस्तान यांच्यात टक्कर होऊ शकते. मात्र फायनलबाबत आत्ताच काही सांगता येत नसले, तरी सुपर-4मध्ये पुन्हा एकदा हे दोघे एकमेकांशी भिडणार हे जवळपास निश्चित आहे. (फोटो सौजन्य-ट्विटर)

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन