-
यष्टीरक्षक फलंदाज म्हणून भारतीय संघासाठी एका कसोटीत सर्वाधित धावा करण्याचा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर आहे. त्याने २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक १५९* धावांची खेळी साकारली आहे.
-
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे. माहीने २००६मध्ये पाकिस्तानविरुद्ध १४८ धावा केल्या होत्या.
-
भारताचा युवा खेळाडू पुन्हा एकदा तिसऱ्या स्थानी आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध २०२२ मध्ये १४६ धावा केल्या होत्या.
-
भारताचा माजी क्रिकेटपटू विजय मांजरेकर या यादीत चौथ्या स्थानी आहे. मांजरेकरांनी १९५३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ११८ धावा केल्या होत्या.
-
यानंतर पाचव्या स्थानी अजय रात्रा आहेत. त्यांनी २००२ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ११५* धावांची खेळी साकारली होती.
-
ऋषभ पंतच्या नावाचा या यादीत पुन्हा एकदा समावेश आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध २०१८ मध्ये ११४ धावांची खेळी केली होती.
-
या यादीत अनुभवी फलंदाज रिद्धीमान साहा सातव्या स्थानी आहे. साहाने २०१६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध १०४ धावांची खेळी केली होती.
-
केएल राहुलने या यादीत आठव्या स्थानावर आहे. त्याने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०१ धावांची खेळी साकारली आहे.
-
ऋषभ पंतच्या नावाचा या यादीत एकूण चौथ्यांदा समावेश आहे. ऋषभने २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १००* धावा केल्या होत्या. (Photo Source -Indian Express)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”