-
टी-20 विश्वचषक स्पर्धेत सलग तीन विजय मिळवून भारतीय संघ सुपर-8 मध्ये पोहोचला आहे. आता भारताचा आणखी एक सामना बाकी आहे. हा सामना १५ जून रोजी कॅनडाविरुद्ध फ्लोरिडामध्ये होणार आहे. (BCCI)
-
या सामन्यानंतर टीम इंडियाच्या संघातील दोन राखीव खेळाडू मायदेशी परततील. कॅनडाविरुद्धच्या सामन्यानंतर शुभमन गिल आणि आवेश खान भारतात परतणार असल्याचं मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलं आहे. (BCCI)
-
तथापि गिल आणि आवेश यांना भारतात परत पाठवण्याचा निर्णय पूर्वनियोजित नव्हता. मात्र, अद्याप आयसीसी किंवा बीसीसीआयकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. (SHUBMAN/INSTAGRAM)
-
वास्तविक, शुभमन गिल आणि आवेश खान अमेरिकेतील सामन्यांनंतर खेळण्याची शक्यता कमी आहे. (AVESH/INSTAGRAM)
-
राखीव खेळाडूंचा बॅकअप म्हणून संघात समावेश केला जातो. जेव्हा एखाद्या खेळाडूला दुखापत होते किंवा इतर परिस्थितीत परतावे लागते तेव्हा बॅकअप खेळाडूंपैकी एकाची निवड केली जाऊ शकते. (BCCI)
-
भारतीय संघाकडे शुबमन गिल आणि आवेश खान यांच्याव्यतिरिक्त रिंकू सिंग आणि खलील अहमदसारखे पर्याय आहेत. (AVESH/INSTAGRAM)
-
भारतीय संघ यूएसए नंतर सुपर-8 साठी वेस्ट इंडिजला जाणार आहे. येथे भारत तीन सामने खेळेल. यानंतर भारताला उपांत्य फेरी आणि नंतर फायनलही खेळता येईल. (SHUBAMAN/INSTAGRAM)
-
अशात हे दोन खेळाडू खेळण्याची शक्यता फारच कमी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दोघांनाही परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (AVESH/INSTAGRAM)
-
भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये फिरकीपटूंवर अधिक अवलंबून असेल. दुसरीकडे, भारताकडे फलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडूंच्या बाबतीत बरेच पर्याय आहेत. (BCCI)
-
भारतीय संघाचा तिसरा सलामीवीर म्हणून यशस्वी जैस्वाल आधीच संघात आहे. त्यामुळे शुभमन गिलची गरज कमी झाली आहे. (AVESH/INSTAGRAM)
-
असे म्हटले जात आहे की रिंकू सिंग आणि खलील अहमद संघासोबत राहतील आणि २० जूनपासून सुरू होणाऱ्या सुपर 8 टप्प्यासाठी भारतीय संघासह ब्रिजटाऊन, बार्बाडोसला जातील. (BCCI)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही