-
टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना २००७ मध्ये डरबन येथे झाला होता. हा सामना पहिल्यांदा बरोबरीत सुटला, यानंतर भारताने ‘बॉल आऊटम’ध्ये विजय मिळवला.
-
जोहान्सबर्ग येथे झालेल्या याच स्पर्धेच्या अंतिम फेरीत या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांची दुसरी गाठ पडली, पुन्हा एकदा या रोमहर्षक सामन्यात भारताने पाच धावांनी विजय मिळवला.
-
२०१२ मध्ये कोलंबो येथे झालेला सामना एकतर्फी होता, ज्यात भारताने ८ विकेट्सने विजय मिळवला होता. पाकिस्तान संघ सातत्याने मागे पडत होता आणि विराट कोहलीने या मोठ्या सामन्यात आपली पहिली छाप पाडली.
-
२०१४ मध्येही परिस्थिती तशीच राहिली, जेव्हा पुन्हा एकदा पाकिस्तानची फलंदाजी कमकुवत दिसली आणि कोहलीने दुसऱ्या टोकाकडून योगदान देऊन भारताला ७ गडी राखून विजय मिळवून दिला.
-
२०१६ मध्ये कोलकाता येथे झालेल्या सामन्यात भारताच्या विजयाची शक्यता कमी होती. कमी धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने शानदार गोलंदाजी केली. पण त्यांना विराट कोहलीला बाद करण्यात अपयश आल्याने भारताने भारताने ६ विकेट्सनी विजय मिळवला.
-
२०२१ चा सामना भारतीय संघासाठी मोठा धक्का होता. कारण बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या विक्रमी सलामीच्या भागीदारीमुळे पाकिस्ताने प्रथमत भारताचा १० गडी राखून पराभव केला.
-
मेलबर्नमधील २०२२ चा विश्वचषकातील सामना आतापर्यंत या दोन संघांमध्ये खेळल्या गेलेल्या सर्वोत्कृष्ट सामन्यांपैकी एक आहे, ज्यामध्ये विराट कोहलीने भारताला सहा विकेट्सने विजय मिळवून देताना सर्वात मोठी खेळी साकारली.
आता ऑफिसमध्ये पाणी पिण्याची पण भीती! पाहा Viral Video तील किळसवाणी घटना