-
लॉकडाऊन काळात इतर राज्यांत अडकलेल्या कामगारांना घरी जाण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. यानंतर राज्यातील महत्वाच्या शहरांमधले कामगार घरी जाण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी करत आहेत. (सर्व छायाचित्र – अरुल हॉरिझॉन)
-
पुणे रेल्वे स्थानकाबाहेर जमलेली कामगारांची गर्दी
-
यातले अनेक कामगार पश्चिम बंगालला जाण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
-
परंतू सध्या अम्फान चक्रीवादळानंतर स्थिरावण्याचा प्रयत्न करणाऱ्या पश्चिम बंगालने राज्यात येणाऱ्या सर्व ट्रेन्स रद्द केल्या आहेत. त्यामुळे या कामगारांवर पुन्हा एकदा वाट पाहण्याची वेळ आली आहे.
-
रेल्वे अधिकाऱ्यांकडून काहीतरी माहिती मिळेल या आशेने हे कामगार इथे जमलेले आहेत., मधल्या वेळेत झोप घ्यायची आणि काही सूचना मिळते का याची वाट पहायची एवढच या कामगारांच्या नशिबी उरलेलं आहे.
-
गेल्या काही महिन्यांमध्ये या कामगारांनी खूप हालअपेष्टा सोसल्या आहेत.
-
अशा परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचं फारसं भान यांना राहत नाही.
-
पुणे शहरालाही करोनाचा सर्वाधिक फटका बसलेला आहे.
-
आपल्याला घरी कधी जायला मिळणार हाच विचार या महिलेच्या मनात घोळत असेल
-
इतक्या गर्दीतही या महिला कामगार शक्य होईल तितकं सरकारी नियमांचं पालन करत आहेत.
-
सेवाभावी संस्थाकडून मिळणाऱ्या जेवणावर यांना अवलंबून रहावं लागत आहे.
-
गाडीची काही सूचना मिळते का याची वाट पाहत रस्त्याच्या कडेला झोपलेल्या आजीबाई….वय झालं तरीही यांच्या नशिबातला संघर्ष काही केल्या संपत नाही.
-
कात्रज भागात टेम्पोमधून सोलापूरच्या दिशेने निघालेलं कामगाराचं कुटुंब (फोटो – आशिष काळे)

४८ तासांमध्ये ५ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! गजकेसरी राजयोगाचा मिळेल भरपूर लाभ अन् यश, लक्ष्मी ठोठावेल दार