-
माझगांव गोदीत आज पहिल्यांदा लागोपाठ दोन युद्धनौकांचे जलावतरण पार पडले (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
-
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत ‘उदयगिरी’ आणि ‘सूरत’ या युद्धनौकांनी पहिल्यांदा पाण्याला स्पर्श केला (फोटो – Indian Navy)
-
या युद्धनौकांसह विविध प्रकराच्या युद्धनौका आणि पाणबुड्या बांधण्याची अभिमानास्पद परंपरा गेले अनेक दशके माझगाव गोदीत सुरु आहे (फोटो – Indian Navy)
-
युद्धनौकेचे जलावतरण हा तांत्रिक दृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक आणि युद्धनौकेच्या बांधणीमधील एक महत्त्वाचा टप्पा असतो (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
-
जलावतरण झाल्यावर आता या युद्धनौकांवर विविध उपकरणे, शस्त्रास्त्रे, नौसैनिकांसाठी आवश्यक सुविधा बसवण्यात येतील (फोटो – Indian Navy)
-
त्यानंतर युद्धनौकेच्या सखोल चाचण्या होतील, उपकरणे-शस्त्रास्त्रे यांची कामगिरी तपासली जाईल (फोटो – Indian Navy)
-
त्यानंतर या युद्धनौका माझगाव गोदीकडून नौदलाकडे सुपुर्त पार पडल्यावर युद्धनौका नौदलात दाखल होईल (फोटो – Indian Navy)
-
नौदलाच्या Project 17A Frigates या प्रकल्पाअंतर्गत पाणबुडी विरोधी कारवाईसाठी ‘उदयगिरी’ युद्धनौका बांधली जात आहे (फोटो – Indian Navy)
-
नौदलाच्या Project 15B Destroyers या कार्यक्रमा अंतर्गत विशाखापट्टणम वर्गातील’सूरत’ही चौथी युद्धनौका आहे (फोटो – ANI)
-
अशा युद्धनौका स्वबळावर बांधल्या जात असून आता देशाच्या गरजेबरोबर इतर देशांच्या मागणीही पूर्ण करु असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केला (फोटो – Indian Navy)

ऐश्वर्या राय सकाळी किती वाजता उठते? जाणून घ्या तिची संपूर्ण दिनचर्या