-
मंगल वाद्यांचा निनाद, सेवाधारीसह वारकऱ्यांनी टाळ वर दिलेली संगत, हजारो भाविकांच्या मुखातून होणारा संत-विठुमाऊली अन गजानन महाराजांचा जयघोष अश्या राजवैभवी थाटात अन पारंपरिक दिमाखात शेगावच्या पालखीने आषाढी वारी साठी पंढरपूरकडे कूच केली.
-
यंदा ५४ व्या वर्षात पदार्पण करणारी शेगावच्या राणाची ही पालखी तब्बल एक महिन्याच्या पायदळ प्रवासानंतर २७ जूनला पंढरपूर ला पोहोचणारआहे.
-
आज ज्येष्ठ शुद्ध सप्तमी अर्थात २६ मे रोजी रोजी पारंपरिक पद्धतीने प्रस्थान सोहळा पार पडला.
-
संत गजानन महाराज मंदिरात विधिवत पूजन करून ‘श्री’च्या रजत मुखवटा सुशोभीत पालखीत विराजमान करण्यात आला.
-
टाळ मृदुंग, तुतारी, ढोल नगारे,बँड च्या निनादात व जयघोषात आणि भगव्या पताकाधारी वारकाऱ्यांसह पालखी निर्धारित मार्गाने रवाना झाली.
-
पालखी २७ जूनला श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये डेरेदाखल होणार आहे.
-
तेथील गजानन महाराज संस्थान शाखेत २ जुलै पर्यंत पालखी मुक्कामी राहणार आहे.
-
३ जुलै रोजी परतीच्या प्रवासाला निघणारी पालखी २३ जुलै रोजी खामगाव( जिल्हा बुलढाणा) मुक्कामी राहील.
-
२४ जुलैला ती स्वगृही शेगावात परतणार आहे.
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”