-
Happy Birthday Uddhav Thackeray: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस.
-
उद्धव ठाकरे यांच्या आजच्या राजकीय यशामध्ये त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.
-
विशेष म्हणजे रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे लग्न नेमके कसे झाले किंवा त्यांची पहिली भेट कशी झाली हे फार कमी जणांना माहित आहे.
-
या फोटो गॅलरीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या पहिल्या भेटीविषयी.
-
रश्मी ठाकरे यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
-
रश्मी ठाकरे या मुळच्या डोंबिवलीकर आहेत.
-
त्यांचे माहेरचे नाव रश्मी माधव पाटणकर असे आहे.
-
मुलुंडच्या वझे-केळकर कॉलेजमधून रश्मी ठाकरे यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे.
-
रश्मी ठाकरे १९८७ साली ‘एलआयसी’मध्ये नोकरीवर रुजू झाल्या होत्या.
-
कंत्राटी स्वरुपाची ‘एलआयसी’मध्ये नोकरी होती.
-
‘एलआयसी’मध्ये नोकरी करत असताना त्यांची जयवंती ठाकरे यांच्याबरोबर मैत्री झाली.
-
रश्मी ठाकरे आणि जयवंती ठाकरे या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या.
-
जयवंती या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहीण आहेत.
-
जयवंती यांनी रश्मी आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणली.
-
उद्धव ठाकरे त्यावेळी राजकारणात फारसे सक्रीय नव्हते ते फोटोग्राफी करायचे.
-
उद्धव ठाकरे यांनी एक अॅड एजन्सी सुद्धा सुरु केली होती.
-
रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झाले आणि हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
-
रश्मी ठाकरेंनी अशी काही छाप पाडली होती की उद्धव ठाकरे त्यांना भेटण्यासाठी डोंबिवलीला जायचे.
-
उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या रेशीमगाठी अशा जुळून आल्या. आणि त्यांनी १३ डिसेंबर १९८९ रोजी एकमेकांसोबत जन्मगाठ बांधली.
-
उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना आदित्य आणि तेजस ही दोन मुले आहेत.
-
उद्धव ठाकरेंच्या या प्रवासात त्यांना रश्मी ठाकरे यांची मोलाची साथ मिळाली.
-
शांत आणि मितभाषी असणार्या रश्मी ठाकरे या एक उद्योजिका देखील आहेत.
-
रश्मी ठाकरे यांचा राजकीय निर्णयांमध्ये किती सहभाग आहे हे ठाऊक नाही. पण शिवसेनेच्या कठीण काळात त्यांनी पक्षाला बांधून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
-
आजही शिवसेनेच्या सर्व कार्यक्रमांमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचा वावर असतो.
-
“रश्मी ठाकरे या मूळात शांत स्वभावाच्या आहेत. त्या मितभाषी असल्या तरी निश्चयी आहेत. त्या स्वत:ला नेहमी कामामध्ये गुंतवून ठेवतात” अशी माहिती त्यांचे काका दिलीप श्रृंगारपुरे यांनी दिली.
-
रश्मी ठाकरे यांच्यावर त्यांचे आई-वडिल आणि सासू-सासऱ्यांचा प्रभाव आहे.
-
“रश्मी यांचे आई-वडिल आणि सासू-सासऱ्यांबरोबर दृढ नाते आहे. कौटुंबिक संस्कारांमध्ये मुले घडतात यावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळेच सत्ता आणि लोकप्रियतेची हवा कधी त्यांच्या डोक्यात गेली नाही” असे दिलीप श्रृंगारपुरे यांनी सांगितले.
-
रश्मी ठाकरे सामनाच्या मुख्य संपादक म्हणून काम करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवसेना / ट्विटर)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ