-
देशाची राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत चालली आहे. आज म्हणजेच ३ नोव्हेंबर रोजी प्रदूषण गंभीर पातळीवर पोहोचले आहे. हवा केवळ विषारीच नाही तर प्राणघातकही झाली आहे. (पीटीआय फोटो)
-
त्यामुळे हे प्रदूषण आणखी वाढणार असल्याचे मानले जात आहे. या फोटोंमध्ये प्रदूषणामुळे दिल्लीत धुके पसरल्याचे पाहायला मिळत आहे. (पीटीआय फोटो)
-
प्रदूषणामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळांचे प्राथमिक वर्ग पुढील दोन दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. (पीटीआय फोटो)
-
याशिवाय, दिल्ली सरकारने दिल्ली आणि दिल्ली एनसीआरमध्ये अनावश्यक बांधकामांसह बीएस-३ पेट्रोल आणि बीएस-४ डिझेल कार चालविण्यावर बंदी घातली आहे. (पीटीआय फोटो)
-
दिल्लीतील अनेक भागात हवेचा दर्जा निर्देशांक AQI ४०० च्या पुढे गेला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) नुसार, हवेच्या गुणवत्तेची ही पातळी गंभीर श्रेणीमध्ये असल्याचे मानले जात आहे. (पीटीआय फोटो)
-
नोएडाबद्दल सांगायचे झाले तर येथील AQI देखील ४०० च्या पुढे आहे. सेक्टर ६२ चा AQI ४८३ आहे, सेक्टर १ चा ४१२ आहे आणि सेक्टर ११६ चा ४१५ आहे जो अत्यंत गंभीर श्रेणीत येतो. (पीटीआय फोटो)
-
एकीकडे गाझियाबादमध्ये हा आकडा ५७२ वर गेला आहे, तर दुसरीकडे आनंद विहारमध्ये AQI ९९९वर पोहोचला आहे. (पीटीआय फोटो)
-
हवामान खात्याने म्हटले आहे की, “प्रदूषणामुळे राजधानीत पुढील तीन दिवस हलके धुके राहण्याची शक्यता आहे. (पीटीआय फोटो)

Amol Kolhe: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हे यांचे धक्कादायक विधान; शरद पवारांच्या सूचनेबाबत म्हणाले…