-
देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा व्यवसाय आज अनेक क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना करण्यासाठी किती मेहनत घेतली आहे. धीरूभाईंनी त्यांचा व्यवसाय कसा सुरू केला.
-
धीरूभाई अंबानी यांचे वडील जुनागढ, गुजरातमध्ये शाळेत शिक्षक होते. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, त्यामुळे त्यांनी हायस्कूल पूर्ण केल्यानंतरच नोकरी करायला सुरुवात केली.
-
धीरूभाई अंबानी यांनी वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी नोकरीसाठी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला. १९४९ मध्ये ते आपला भाऊ रमणिकलाल याच्यासोबत येमेनच्या एडन शहरात पैसे कमावण्यासाठी गेले.
-
तिथे त्यांनी एका पेट्रोल पंपावर काम केले. या कामासाठी त्यांना दरमहा ३०० रुपये मिळत. धीरूभाईंचे काम पाहून कंपनीने त्यांना फिलिंग स्टेशनचे व्यवस्थापक बनवले.
-
काम करता करता धीरूभाई अंबानी यांनी व्यवसाय कसा चालवायचा याची गुपते जाणून घेतली आणि काही वर्षे तेथे काम केल्यानंतर ते १९५४ मध्ये एक स्वप्न घेऊन भारतात आले.
-
कापड कंपनी उघडण्याचे त्यांचे स्वप्न होते. भारतात पॉलिस्टर कपड्याची मागणी आणि भारतीय मसाल्यांना परदेशात सर्वाधिक आहे हे धीरूभाईंना समजले होते.
-
त्यानंतर त्यांनी रिलायन्स कॉमर्स कॉर्पोरेशन कंपनी सुरू केली, या कंपनीने परदेशात भारतीय मसाले आणि परदेशी पॉलिस्टर भारतात विकण्यास सुरुवात केली. धीरूभाईंच्या विपणन कौशल्याने त्यांना पॉलिस्टर प्रिन्स बनवले.
-
त्यानंतर धीरूभाई अंबानींनी कधीच मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्यांनी तेल, प्लॅस्टिक आणि पॉवर इंडस्ट्रीजमध्ये आपल्या शाखांचा विस्तार केला. काही वेळातच रिलायन्सचे मोठ्या गटात रूपांतर झाले.
-
धीरूभाई अंबानींचा व्यवसाय इतका वेगाने वाढला की २००० साली ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या मृत्यूसमयी रिलायन्स ६२ हजार कोटी रुपयांची कंपनी बनली होती. ६ जुलै २००२ रोजी त्यांचे निधन झाले.
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ