-
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरा केला जातो. या वर्षी २६ ऑगस्ट रोजी देशभरात जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे.
-
हिंदू धर्मीयांमध्ये श्रीकृष्ण जन्म पवित्र उत्सव मानला जातो. या दिवशी अनेक घराघरांत, मंदिरात रात्री १२ वाजता श्रीकृष्णाची बाल मूर्ती पाळण्यात ठेवून मनोभावे पूजा करीत जन्माष्टमीचा सोहळा साजरा होतो. (photo – indian express
-
पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा रात्री १२ वाजताच का सुरू होतो? जाणून घेऊ …
-
विष्णूचा आठवा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला बुधवारी द्वापारयुगातील रोहिणी नक्षत्रात झाला. भगवान श्रीकृष्ण हे जन्माआधीच सिद्धींनी संपन्न होते.
-
भगवान श्रीकृष्णाच्या जन्मावेळची एक आख्यायिका सांगितले जाते की, कंसाने आपली बहीण देवकी हिचा वसुदेवाशी विवाह करून दिला. या विवाहानंतर तिला रथात बसवून तो निरोप देत होता.
-
त्यावेळी एक आकाशवाणी झाली, की, देवकीच्या आठव्या मुलाच्या हातून कंसाचा वध होईल. त्यानंतर घाबरलेल्या कंसाने वसुदेव आणि देवकीला तुरुंगात टाकले. त्यानंतर कंसाने देवकीच्या एक-एक करून सहा मुलांचा वध केला.
-
अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री कंसाने वसुदेव आणि देवकीला डांबलेल्या तुरुंगाची सर्व कुलपे तुटून पडली. यादरम्यान सर्व सैनिक गाढ झोपले होते.
-
या रात्री आभाळ दाट ढगांनी झाकले होते. जोरदार पाऊस पडू लागला. विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर देवकीच्या पोटी कृष्णाचा जन्म झाला.
-
श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीच्या मध्यरात्री होण्याचे मुख्य कारण म्हणजे तो चंद्रवंशी (यदुवंश) होता. धार्मिक मान्यतेनुसार, श्रीकृष्ण हा चंद्रवंशी होता. श्रीकृष्णाचे पूर्वज चंद्रदेव होते आणि बुध चंद्राचे पुत्र होते.
-
त्या कारणास्तव श्रीकृष्णाने चंद्रवंशात जन्म घेण्यासाठी बुधवारची निवड केली. ज्योतिषांच्या मते, रोहिणी ही चंद्राची प्रिय पत्नी आणि नक्षत्र आहे; ज्यामुळे श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात झाला.
-
त्याच वेळी अष्टमी तिथीला जन्म घेण्यामागेही एक कारण होते आणि ते म्हणजे अष्टमी तिथी हे शक्तीचे प्रतीक आहे. याच शक्तीमुळे भगवान विष्णू संपूर्ण विश्व चालवत होते. तर श्रीकृष्ण शक्तिशाली, आत्मकेंद्रित व परब्रह्मस्वरूप आहेत.
-
म्हणून त्यांचा जन्म अष्टमीला झाला. असे म्हणतात की, रात्री चंद्र उगवला आणि त्यांचा जन्म झाला, यावेळी त्यांचे सर्व पूर्वजही उपस्थित होते.
-
अशीही एक कथा सांगितली जाते की, कंसाच्या तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी भगवान श्रीकृष्णानेही मध्यरात्रीची निवड केली; जेणेकरून त्याचे वडील त्याला सुरक्षित ठिकाणी पाठवू शकतील.
-
म्हणून जेव्हा कृष्णाचा जन्म झाला तेव्हा सर्व तुरुंगांचे दरवाजे उघडले आणि सैनिक गाढ झोपेत गेले. त्यामुळे त्यांचे वडील वसुदेव गोकुळात सुखरूप पोहोचू शकले आणि तुरुंगात असलेल्या पत्नीकडे परत आले.
-
याच कारणामुळे भारतात सर्वत्र श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मध्यरात्री साजरा केला जातो. (photo credit – indian express, pixabay, unsplash)

India beats Pakistan Video: पाकिस्तानी युवतीचा त्रागा; म्हणाली, “हरलात ते ठीक आहे, पण त्या कोहलीचं शतक…”!